शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एखादा सरपंच आपल्या गावासाठी काय करु शकतो… हे बघा… चर्चा तर होणारच…

सप्टेंबर 17, 2023 | 5:18 am
in संमिश्र वार्ता
0
60256 n

सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘गाव करील ते राव काय करील!’ असे म्हटले जाते. याचाच अर्थ गावाने ठरवले तर कोणतेही चांगले, विकासात्मक काम होऊ शकते, म्हणजे एकीचे बळ तिथे कामी येते. एखादा व्यक्ती, पुढारी, राव किंवा रावसाहेब, गावचा पाटील, सरपंच एकट्याने काहीही करू शकत नाही, असा या म्हणी मागील अर्थ आहे. महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत की, त्या गावातील ग्रामस्थ तथा गावकऱ्यांनी एकोप्याने तथा एकजुटीने एकत्र येत आपल्या गावाला आदर्श गाव तथा आगळीवेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. अर्थात यामध्ये त्या गावातील पुढारी तथा गावातील प्रमुखाचाही त्यामध्ये वाटा आहे.

अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी आणि पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार या गावांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. मात्र त्याचप्रमाणे राज्यातील अन्य प्रांत तथा विभागातही अनेक गावांनी असाच विकास करून राज्याच्या नकाशावर आपले नाव कोरले आहे. एक मात्र खरे की, एकटा व्यक्ती काहीही करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यकच ठरते. मात्र काही ठिकाणी गाव प्रमुखाचे नेतृत्व तसेच सकारात्मक काम उठून दिसते याचा प्रत्यय सांगली जिल्ह्यात आला. गावात एका गावातील सरपंचाने चक्क आपल्या शेतातील विहिरीतून गावासाठी सहा महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वखर्चाने पाईपलाईन करून दिली, त्यांनीआपल्या शेताला पिकाला पाणी देण्याऐवजी त्याने गावकऱ्यांची तहान भागविली याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाणी देण्याचे ठरवले
सांगलीतील काही तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे नदी तलाव धरणे यांना पाणीसाठा पुरेसा नाही साहजिकच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते त्यात रेवणगावचा ही समावेश आहे, या गावात पाणीटंचाईचे संकट असताना गावचे सरपंच सचिन मुळीक यांनी आपल्या शेतातील बोअरवेलचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून गावाला देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सुमारे १ लाख रुपये खर्च करून शेतापासून गावापर्यंत स्वखर्चाने पाईपलाइन केली असून स्वत:ची शेत जमीन पडीक ठेवत गावाला स्वखर्चाने पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला आहे. सरपंच मुळीक हे दिलदारपणे सध्या गावची सहा महिन्यापासून तहान भागवत आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सरपंचाने स्वतःची शेती जमिन पडीक ठेवली. त्यांच्या शेतातील उभी पिके सुकून गेली आहेत. त्यामुळे गावकरी आमचा सरपंच हा खऱ्या अर्थाने गावची काळजी घेणारा सरपंच असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.

महिलांची पाण्यासाठी वणवण
पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावोगावी पाणी टंचाई निर्माण झाली असून रेवणगावात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावाला पाणी कुठून उपलब्ध करून द्यायचे असा प्रश्न उभा राहिला होता. रेवणगाव हे खानापूर तालुक्यात घाटमाथ्यावरील सुमारे १४०० लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाला फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवू लागला. गावासाठी शासनाची जलजीवनमिशनची योजना होती, मात्र ती अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच शासनाकडे टँकरची मागणी करणे शक्य नव्हते, तेव्हागावचे सरपंच सचिन मुळीक आपल्या चार एकर शेतातील पिकांना बोअरवेलचे पाणी शेत तळ्यात टाकून देत होते.

स्वतः केला खर्च
गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुळीक यांनी मार्च महिन्यापासूनच शेतीला पाणी न देता आता गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेततळ्यापासून ते गावच्या पाण्याच्या टाकी पर्यंत सरपंचाने लाखभर खर्च करून पाइपलाइन देखील केली. आज दिवसाला ७० हजार लिटर पाणी ते स्वतःची जमीन पडीक ठेऊन देत आहेत. तेव्हा टँकर सुरू झाला असता तरीही घरी पाणी हे बहुतांश वेळा महिलांनाच आणावे लागले असते. त्यामुळे सरपंचानी पाणी दिल्यामुळे वणवण करून पाणी आणण्याचा त्रास कमी झाला असल्याची भावना गावातील महिलांनी व्यक्त केली आहे.

Sangli Revangaon Sarpanch Ideal Work for Village
Sachin Mulik Water Issue Pipeline

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य… अल्प भूधारक शेतकरी राहुल किटुकले यांचा जबरदस्त प्रयोग…

Next Post

बँकेची कर्मचारी सोडताय नोकरी… हे आहे धक्कादायक कारण…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बँकेची कर्मचारी सोडताय नोकरी... हे आहे धक्कादायक कारण...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011