इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृध्दी महामार्गावरील ब्रिजवर मोठ्या प्रमाणात खिळे ठोकल्यामुळे नागपूरकडून मुंबईकडे जाणा-या अनेक गाड्या पंचर झाल्याची धक्कादायक घटना घडली. या गाड्या का पंचर झाल्या म्हणून गाड्यांच रीघ लागली. गाड्या पंचर झाल्यानंतर वाहकांच्या गाड्या थांबल्या. त्यानंतर त्यांना या ब्रिजवर खिळे ठोकल्याचे लक्षात आले.
प्रथमदर्शनी लोकांना हे खिळे चोरट्यांनी ठोकले असावे असे वाटले. पण, प्रत्यक्षात हे खिळे रस्त्याचे काम करणा-या कंपनीने लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे हे खिळे लावल्यानंतर कोणतेही बॅरिंगेटिंग येथे केलेले नव्हते. त्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. गाड्या पंचर झाल्याची घटना समोर आल्यानंतर रात्रीतून हे खिळे काढण्यात आले.
समृध्दी महामार्गावर एकीकडे अपघातांचे मोठे प्रमाण असतांना खिळे लावण्याचा प्रकार गंभीर आहे. यामुळे मोठी दर्घटना सुध्दा होऊ शकते.