इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृध्दी महामार्गाचा शेवटच्या चौथ्या टप्पाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनात शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ७६ किलोमिटरचा हा टप्पा इगतपुरी ते ठाणे आमना पर्यंत आहे. हा शेवटच्या टप्प्यामुळे ६ तासात नागपूर मुंबई अंतर पूर्ण होणार आहे.
याअगोदर ६२५ किलोमीटरचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. नागपूर ते शिर्डी दरम्यानचा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्याचे उदघाटन डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिर्डी ते भरवीरपर्यंतचा दुस-या टप्याचे उदघाटन मे २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानंतर या वर्षी अतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील भरवीर ते इगतपुरी शहरा दरम्यानचा २५ किलोमीटराचा रस्ताही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आता शेवटच्या टप्याचे लोकार्पण करण्यात आले.
हा महामार्ग सुरु झाल्यानंतर नाशिकहून मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.