शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

समृद्धी महामार्गावर अपघात का होताय? VNITच्या संशोधनात उघड झाल्या या धक्कादायक बाबी

मे 1, 2023 | 2:10 pm
in इतर
0
Samruddhi Mahamarga e1664365882337

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रासाठी विकास मार्ग मानला जाणारा समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरीत आहे. जानेवारी ते एप्रिल २०२३ पर्यत या महामार्गावर सुमारे ४५० अपघातात सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला. यात पुरूष व महिला आणि लहान मुलांचा समावेश असून हा महामार्ग सुरू झाल्यापासून अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावे लागला आहे. त्यामुळे अनेक जण हा महामार्ग टाळत आहेत. अन्य महामार्गांपेक्षा या महामार्गावर सर्वाधिक अपघात का होत आहेत, याची सर्वांना चिंता होती. त्या संदर्भात संशोधन केले असता अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघात होत आहेत. या अपघातांची कारणे शोधण्यासाठी नागपूरच्या विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआईटी)मधील ‘ट्रान्सपोर्ट’ विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी तीन महिने अभ्यास केला. त्यात सर्वाधिक अपघात ‘महामार्ग संमोहन’मुळे झाल्याचे पुढे आले आहे. चालकाला डुलकी लागणे, अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, अतिरिक्त भार असलेले वाहन चालवणे, ताण, रस्ता संमोहन, लक्ष विचलित होणे आदी कारणांमुळे अपघात झाल्याचे या सांगितले जाते.

अपघात होऊ नये म्हणून समृद्धी महामार्गावर बहुतांश ठिकाणी रोवर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तसेच वन्यप्राणी आडवे येऊ नये म्हणून क्रॅश बॅरीअरच्या बाजूने चेन लिंकींग फेन्सिंग उभारण्यात येत आहे. तसेच बुथवर पब्लिक अॅड्रेस सिस्टिम लावण्यात येत आहे.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी दरम्यान पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर येथे प्रवासाचा वेळ कमी झाला. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. अपघाताची कारणे शोधण्यासाठी नागपूरच्या ‘व्हीएनआयटी’ संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ट्रान्सपोर्टेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर तीन महिने नागपूरहून १०० किलोमीटर परिसरात अभ्यास केला. त्यात समृद्धीवरील अपघातासाठी ‘महामार्ग संमोहन’ जबाबदार असल्याचे निरीक्षणातून दिसून आले आहे.

विशेषतः एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो. कोणत्याही अडथळ्याविना त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकाच मार्गे वेगात अनेक मिनिटे धावत असते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. असा प्रकार समृद्धी महामार्गावर घडत आहे. समृद्धी महामार्गावर अनेक चालक याचे बळी ठरले असून अपघाताच्या काही सेकंद आधी त्यांच्या मेंदूने व शरीराने जी हालचाल किंवा क्रिया करायला हवी ती वेळेत न केल्याने अपघात झाले असल्याचे दिसून आले.

‘महामार्ग संमोहन’ हे ३३ टक्के अपघातांना कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. समृद्धी महामार्गावर तीन पदरीचे दोन स्वतंत्र ट्रॅक आहेत. त्यामुळे समोरासमोर वाहन धडकून अपघात घडण्याचा प्रश्न नाही. समोरच्या वाहनाचा चालक आपली मार्गिका सोडून दुसऱ्या मार्गिर्केत जाताना नियमांचे पालन करत नाही. ‘महामार्ग संमोहन’ची क्रिया काम करत असल्याने चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाचीही संधी मिळत नाही. त्यामुळे बाजूने धडक बसते.

आजवर झालेल्या अपघातात ४० टक्के अपघात अशाच प्रकारे झाले आहेत. ५१ टक्के ट्रकचालक मार्गिका पालन करत नाहीत. तसेच प्रफुल मडधे, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत, आयुष्य दूधबावरे या व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

Samruddhi Highway Accident Research Causes

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवारांच्या आत्मचरित्रात खळबळजनक दावा; असं काय लिहिलंय? राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा

Next Post

कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईनद्वारे ‘या’ तारखेपासून मिळणार स्वच्छ आणि मुबलक पाणी; पालकमंत्र्यांची घोषणा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
FvB5zp aAAAmqcC

कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईनद्वारे 'या' तारखेपासून मिळणार स्वच्छ आणि मुबलक पाणी; पालकमंत्र्यांची घोषणा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011