इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडं मनरेगाच्या कामांसाठी निधी नसल्याने पानंद रस्ते, शिव रस्ते यांसारखी महत्वपूर्ण कामे प्रलंबित आहेत, हजारो कोटींची मजुरी थकीत आहे तर दुसरीकडं मात्र सरकार ‘मनरेगा’च्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळत आहे. सरकारने नुकताच पालखी मार्गावर ‘मनरेगा’च्या प्रसिद्धीकरीता १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली.
ते म्हणाले की, काळी जादू होते का? हे माहित नाही परंतु रोजगार हमीमध्ये जाहिरातींचा काळा बाजार नक्की सुरु आहे आणि सरकारची ही कार्यपद्धती बघून तुकोबारायांच्या “नाठाळाचे माथी हाणू काठी” या ओळी प्रत्यक्ष अमलात आणाव्यात असं वाटतं.