इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इराण – इस्त्रायल युध्दामध्ये अनेकारिकेने एंन्ट्री केली. त्यात तीन इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला करुन ती नष्ट केली. त्यामुळे इराण संतपालेला असतांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली.
या दोघांमध्ये झालेल्या चर्चेबाबत मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,
इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी बोललो आम्ही सध्याच्या परिस्थितीबद्दल सविस्तर चर्चा केली. अलिकडच्या काळात वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तणाव कमी करण्यासाठी, संवाद आणि राजनयिकतेचा मार्ग म्हणून आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी आमचे आवाहन पुन्हा एकदा मांडले.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चर्चेनंतर इराण काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे आहे. युध्द थांबणार का असा प्रश्नही आहे.