गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बंडखोरांचे हॉटेल राजकारण पहिल्यांदाच होतेय का? असा आहे त्याचा भारतातील रंजक इतिहास

by Gautam Sancheti
जून 26, 2022 | 2:00 pm
in संमिश्र वार्ता
0
guwahati1

 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सत्ता ही चंचल असते. ती एका जागी कधीही स्थिर राहत नाही. तर राजकारणात विश्वास हा अदृश्य असतो तर दुसरीकडे अविश्वास हा ठायी ठायी दिसतो, असेही सांगितले जाते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व जनतेला येत आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय भूकंप कथा सत्तांतर नाट्य आता वेगळेच वळण घेतले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये जाऊन बसले आहे. अशा प्रकारचे हे बंडखोरांचे हॉटेल राजकारण काही पहिल्यांदाच होत नाहीय. त्याचा असा रंजक इतिहास आहे.

जून २०२२:
राज्यसभा निवडणुकीतही रिसॉर्ट राजकारणाचा अवलंब करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राजस्थानमधील काँग्रेसच्या ७० आमदारांना उदयपूर येथील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. याचा फायदा काँग्रेसलाही झाला. या निवडणुकीच्या निकालात राजस्थानमधील चारपैकी तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, त्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी “लोकशाहीचा विजय” असे वर्णन केले.

जुलै २०२०:
राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर संकट असताना, पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना राज्यातील फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये ठेऊन घेतले होते. पायलटला पाठिंबा देणारे आमदार स्वतः दिल्लीत होते आणि नंतर भाजपशासित राज्यातील एका रिसॉर्टमध्ये गेले. मात्र, शेवटी सरकार पडले नाही आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री राहिले. मात्र सध्या सचिन पायलटचे नुकसान झाले असून त्यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे.

मार्च २०२०:
मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आमदारांना भाजपशासित राज्यातील बेंगळुरूमधील प्रेस्टीज गोल्फ क्लबमध्ये नेण्यात आले. यापूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही पक्ष सोडला होता. त्यांच्या पाठिंब्याने शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, नंतर सिंधिया भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता ते केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत.

 २०००:
बिहार विधानसभा अध्यक्षांनी बहुमत नसतानाही नितीश कुमार यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला, तरी नितीश कुमार यांना राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलावले होते. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि आरजेडी या विरोधी पक्षांनी त्यांच्या काही सदस्यांना पाटण्यातील हॉटेलमध्ये पाठवले होते. मात्र, विश्वासदर्शक ठरावापूर्वी नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि आरजेडीच्या राबडी देवी बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या.

१९८४:
आंध्र प्रदेशातही राज्याचे अर्थमंत्री भास्कर राव यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री एनटीआर यांचे सरकार पाडले. तेव्हा चित्रपट सुपरस्टार-राजकारणी बनलेले एनटीआर देशाबाहेर होते आणि राज्यपालांनी भास्कर राव यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी एनटीआरने जवळपास १६० आमदारांना सर्व सुविधांसह स्टुडिओत ठेवले होते. मात्र, भास्कर राव यांना बहुमत सिद्ध करता आले नाही आणि त्यांचे सरकार पडले. त्यानंतर एनटीआर पुन्हा सत्तेत आले.

१९९५ः
एनटीआरचे जावई एन चंद्राबाबू नायडू यांना एनटीआरला आंध्र प्रदेशातून पक्षातून काढून टाकायचे होते. टीडीपीला सांभाळण्यासाठी अशा एनटीआर निष्ठावंतांना हैदराबादच्या व्हाइसरॉय हॉटेलमध्ये पाठवण्यात आले.

rebel politics in india interesting history maharashtra political crisis

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बंडखोरांसाठी केंद्र सरकार सरसावले; घराच्या सुरक्षेसाठी CRPF जवान तैनात

Next Post

११ लाखांच्या सुंदर महापैठणीची महाविजेती थोड्याच वेळात ठरणार; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FVxfLhqUEAAm hw

११ लाखांच्या सुंदर महापैठणीची महाविजेती थोड्याच वेळात ठरणार; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, ७ जुलैचे राशिभविष्य

ऑगस्ट 6, 2025
देवगाव शनि हरिनाम सप्ताह सोहळा ३ 1024x527 1

सरला बेट विकास आराखडा व शनि देवगाव येथील बंधाऱ्यास मंजूरी देणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑगस्ट 6, 2025
IMG 20250806 WA0367

नाशिक शहरात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्याचा धुमाकूळ…अशी करतो वसुली

ऑगस्ट 6, 2025
dada bhuse

आता विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण…शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

ऑगस्ट 6, 2025
Untitled 7

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

ऑगस्ट 6, 2025
Untitled

ठाकरे ब्रॅण्ड…मुंबईत या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती…

ऑगस्ट 6, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011