शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रिलायन्सचा ईशान्य भारतात ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्धार

by Gautam Sancheti
मे 23, 2025 | 4:49 pm
in संमिश्र वार्ता
0
mukesh ambani reliance

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ईशान्य भारतातील गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. सध्या या भागात कंपनीने सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ पुढील पाच वर्षांत रिलायन्स या राज्यांमध्ये सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक करणार आहे. ते दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘रायझिंग नॉर्थईस्ट इन्व्हेस्टर्स समिट’मध्ये बोलत होते.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल आणि सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करत, अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशवासीयांचे अभिनंदन करत आपल्या भाषणाची सुरुवात केली.

मुकेश अंबानी यांनी सांगितले की, प्रस्तावित गुंतवणुकीमुळे २५ लाखांहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या राज्यांमध्ये ३५० बायोगॅस प्रकल्प उभारण्याचीही कंपनीची योजना आहे. जिओ नेटवर्कविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, रिलायन्स जिओचे ५जी नेटवर्क ईशान्य भारतातील सुमारे ९० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचले आहे. सध्या ५० लाख लोक जिओ ५जी नेटवर्कशी जोडले गेले असून, ही संख्या यावर्षी १ कोटींपर्यंत जाईल.

शेती उत्पन्न वाढवण्यासाठी रिलायन्स रिटेल शेतकऱ्यांकडून थेट खरेदीला प्रोत्साहन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या कार्यप्रदर्शनाचे कौतुक करताना अंबानी म्हणाले, “आपल्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारत आता मुख्य प्रवाहात आला असून, देशाच्या विकासाच्या नकाशावर ठळकपणे उमटला आहे.”

आरोग्य क्षेत्रातील योगदानाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, रिलायन्स फाउंडेशनने मणिपूरमध्ये १५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय स्थापन केले आहे. स्तन कर्करोगाच्या उपचारांसाठी मिजोराम विद्यापीठासोबत जीनोमिक डेटाच्या आधारे सहकार्य सुरू आहे. गुवाहाटीमध्ये अ‍ॅडव्हान्स मॉलिक्युलर डायग्नोस्टिक आणि रिसर्च लॅबही उभारण्यात आली असून, ती भारतातील सर्वात मोठ्या जीनोम सिक्वेन्स क्षमतेने सुसज्ज असेल.

उत्तर-पूर्वेतील सर्व आठ राज्यांमध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने ऑलिंपिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केली जाणार असून, यामधून उदयोन्मुख खेळाडू ऑलिंपिकमध्ये पदके जिंकू शकतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेतजमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करुन शेजा-याने जेसीबीच्या सहाय्याने बांध तोडला…गुन्हा दाखल

Next Post

मुसळधार पावसाची शक्यता; महावितरण ‘हाय अलर्ट’वर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
mahavitarn

मुसळधार पावसाची शक्यता; महावितरण ‘हाय अलर्ट’वर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011