रविवार, सप्टेंबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्र सरकार पैसे देते म्हणून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार काय़ ? इंजि. राजेंद्र जाधव

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 2, 2022 | 3:24 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220202 WA0185 e1643795621639

नाशिक – केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प-२०२२ सादर करताना दमणगंगा –पिंजाळ व पार-तापी-नर्मदा ह्या नदी जोड प्रकल्पांना निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यापैकी “दमणगंगा-पिंजाळ लिंक” ह्या नदीजोड प्रकल्पाचे पाणी महाराष्ट्रातील दमणगंगा खोऱ्यातून पिंजाळ खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. त्याबद्दल जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे. मात्र पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पात महाराष्ट्राच्या नार-पार खोऱ्यातील १५ टीएमसी पाणी गुजरातमध्ये १२०० किमी उत्तरेकडे नेण्यात येणार आहे. तसेच याच पाण्यावर गुजरात मध्ये मुंबईच्या धर्तीवर धोलेरा नावाचे आंतरराष्ट्रीय शहर उभारण्यात येणार आहे. त्याचा आकार शांघाय शहराच्या पाच पट व दिल्लीच्या दुप्पट आहे. भारताचा संपूर्ण उद्योग व व्यापार या भागात केंद्रित करायचे गुजरातचे नियोजन आहे. त्याचसाठी समुद्रात ३७० टीएमसीचे धरण बांधण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. संयुक्त महाराष्ट्रात महाराष्ट्राला मिळालेल्या मुंबईच्या बदल्यात धोलेरा नावाची नवीन महामुंबई गुजरात निर्माण करीत आहे. सबब पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पाला आमचा विरोध आहे असे इंजि. जाधव म्हणाले. पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पासाठी “महाराष्ट्राने पाण्याचा हक्क गुजरातला दिल्यास”, गिरणा खोऱ्यातील कळवण-सटाणा-देवळा-मालेगाव-नांदगाव-चांदवड-येवला आणी जळगाव जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळी राहण्याची शक्यता इंजि. राजेंद्र जाधव यांनी वर्तवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार पैसे देते आहे म्हणून महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यास जनतेने विरोध करावा असे आव्हान त्यांनी केले. किंबहुना महाराष्ट्राच्या नदी जोड प्रकल्पांना पैसे देणे हे केंद्राचे कर्तव्यच आहे असे ते म्हणाले.

केंद्राची भूमिका महाराष्ट्रावर अन्यायकारक “विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात दुष्काळी भागात पाणी वळवणे” हे नदी जोड प्रकल्पाचे मुख्य तत्व आहे. मग दुष्काळी भाग एकाच राज्यातील राज्यांतर्गत असो किंवा दोन राज्यातील असो. या तत्वाला तिलांजली देऊन केंद्र सरकारने फक्त दोन किंवा जास्त राज्यात पाणी वळवण्यात येणार असेल तर त्या नदी-जोड प्रकल्पांनाच आम्ही पैसे देऊ अशी भूमिका केंद्राने घेतली आहे. ती महाराष्ट्रावर अन्यायकारक आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परीस्थिती पाहता दुष्काळी मराठवाड्याला कोकणातून पाणी द्यावे लागणार आहे. आत्महत्याग्रस्त

पश्चिम विदर्भाला पूर्व विदर्भातील वैनगंगा खोऱ्यातून पाणी आणावे लागणार आहे आणी दक्षिण कृष्णा खोऱ्यातील अतिरक्त पाणी “कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना”चे माध्यमातून उस्मानाबाद-लातूरला ध्यावे लागणार आहे. हे सर्व नदी जोड प्रकल्प राज्यांतर्गत आहेत. याशिवाय गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक-७टीएमसी, दमणगंगा –एकदरे लिंक-५ टीएमसी, पार-कादवा लिंक-३.५ टीएमसी, नार-पार-गिरणा लिंक-१२.५ टीएमसी हे चार नदी जोड प्रकल्पाचे अहवाल पूर्ण झाले असून अंतिम मंजुरीच्या टप्यात आहेत. त्यांचा एकूण अंदाजे खर्च ३४००० कोटी आहे. हे सर्व प्रकल्प उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दुष्काळी भागात पाणी नेणारे असताना देखील ह्या सर्व नदी जोड प्रकल्पांना पैसे देण्यास केंद्र सरकार नकार देत आहे ही महाराष्ट्राला सपत्न भावाची वागणूक आहे. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घ्यावी अशी विनंती ना. जयंत पाटील, जलसंपदा मंत्री यांना करणार असल्याचे इंजि. राजेंद्र जाधव यांनी म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उत्तर प्रदेशात रंगतदार लढती; कुठे पती-पत्नी तर कुठे पिता-पुत्र यांच्यात सामना

Next Post

सिन्नर फुटवेअरच्या दुकानात आग, लाखोचे नुकसान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणुकीच्या प्रकरणात सुनावली ४ वर्षांची शिक्षा…

सप्टेंबर 21, 2025
bullete train
महत्त्वाच्या बातम्या

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती

सप्टेंबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी…

सप्टेंबर 21, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

भारतीय शिष्टमंडळ या तारखेला अमेरिकेला भेट देणार…या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 21, 2025
G1Sin8kW4AAjERO e1758416853507
मुख्य बातमी

दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर…असा आहे प्रवास

सप्टेंबर 21, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणीची मंत्रालयातून गंभीर दखल, गुन्हा दाखल, तिघांना अटक

सप्टेंबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, २१ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 20, 2025
cricket
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये नोव्हेंबर मध्ये दोन रणजी सामन्यांचा थरार….हे सामनेही होणार

सप्टेंबर 20, 2025
Next Post
IMG 20220202 WA0014 e1643798587853

सिन्नर फुटवेअरच्या दुकानात आग, लाखोचे नुकसान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011