रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

केंद्र सरकार पैसे देते म्हणून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार काय़ ? इंजि. राजेंद्र जाधव

फेब्रुवारी 2, 2022 | 3:24 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220202 WA0185 e1643795621639

नाशिक – केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प-२०२२ सादर करताना दमणगंगा –पिंजाळ व पार-तापी-नर्मदा ह्या नदी जोड प्रकल्पांना निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यापैकी “दमणगंगा-पिंजाळ लिंक” ह्या नदीजोड प्रकल्पाचे पाणी महाराष्ट्रातील दमणगंगा खोऱ्यातून पिंजाळ खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. त्याबद्दल जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष इंजि. राजेंद्र जाधव यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे. मात्र पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पात महाराष्ट्राच्या नार-पार खोऱ्यातील १५ टीएमसी पाणी गुजरातमध्ये १२०० किमी उत्तरेकडे नेण्यात येणार आहे. तसेच याच पाण्यावर गुजरात मध्ये मुंबईच्या धर्तीवर धोलेरा नावाचे आंतरराष्ट्रीय शहर उभारण्यात येणार आहे. त्याचा आकार शांघाय शहराच्या पाच पट व दिल्लीच्या दुप्पट आहे. भारताचा संपूर्ण उद्योग व व्यापार या भागात केंद्रित करायचे गुजरातचे नियोजन आहे. त्याचसाठी समुद्रात ३७० टीएमसीचे धरण बांधण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. संयुक्त महाराष्ट्रात महाराष्ट्राला मिळालेल्या मुंबईच्या बदल्यात धोलेरा नावाची नवीन महामुंबई गुजरात निर्माण करीत आहे. सबब पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पाला आमचा विरोध आहे असे इंजि. जाधव म्हणाले. पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पासाठी “महाराष्ट्राने पाण्याचा हक्क गुजरातला दिल्यास”, गिरणा खोऱ्यातील कळवण-सटाणा-देवळा-मालेगाव-नांदगाव-चांदवड-येवला आणी जळगाव जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळी राहण्याची शक्यता इंजि. राजेंद्र जाधव यांनी वर्तवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार पैसे देते आहे म्हणून महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यास जनतेने विरोध करावा असे आव्हान त्यांनी केले. किंबहुना महाराष्ट्राच्या नदी जोड प्रकल्पांना पैसे देणे हे केंद्राचे कर्तव्यच आहे असे ते म्हणाले.

केंद्राची भूमिका महाराष्ट्रावर अन्यायकारक “विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात दुष्काळी भागात पाणी वळवणे” हे नदी जोड प्रकल्पाचे मुख्य तत्व आहे. मग दुष्काळी भाग एकाच राज्यातील राज्यांतर्गत असो किंवा दोन राज्यातील असो. या तत्वाला तिलांजली देऊन केंद्र सरकारने फक्त दोन किंवा जास्त राज्यात पाणी वळवण्यात येणार असेल तर त्या नदी-जोड प्रकल्पांनाच आम्ही पैसे देऊ अशी भूमिका केंद्राने घेतली आहे. ती महाराष्ट्रावर अन्यायकारक आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परीस्थिती पाहता दुष्काळी मराठवाड्याला कोकणातून पाणी द्यावे लागणार आहे. आत्महत्याग्रस्त

पश्चिम विदर्भाला पूर्व विदर्भातील वैनगंगा खोऱ्यातून पाणी आणावे लागणार आहे आणी दक्षिण कृष्णा खोऱ्यातील अतिरक्त पाणी “कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना”चे माध्यमातून उस्मानाबाद-लातूरला ध्यावे लागणार आहे. हे सर्व नदी जोड प्रकल्प राज्यांतर्गत आहेत. याशिवाय गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक-७टीएमसी, दमणगंगा –एकदरे लिंक-५ टीएमसी, पार-कादवा लिंक-३.५ टीएमसी, नार-पार-गिरणा लिंक-१२.५ टीएमसी हे चार नदी जोड प्रकल्पाचे अहवाल पूर्ण झाले असून अंतिम मंजुरीच्या टप्यात आहेत. त्यांचा एकूण अंदाजे खर्च ३४००० कोटी आहे. हे सर्व प्रकल्प उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दुष्काळी भागात पाणी नेणारे असताना देखील ह्या सर्व नदी जोड प्रकल्पांना पैसे देण्यास केंद्र सरकार नकार देत आहे ही महाराष्ट्राला सपत्न भावाची वागणूक आहे. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घ्यावी अशी विनंती ना. जयंत पाटील, जलसंपदा मंत्री यांना करणार असल्याचे इंजि. राजेंद्र जाधव यांनी म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उत्तर प्रदेशात रंगतदार लढती; कुठे पती-पत्नी तर कुठे पिता-पुत्र यांच्यात सामना

Next Post

सिन्नर फुटवेअरच्या दुकानात आग, लाखोचे नुकसान

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20220202 WA0014 e1643798587853

सिन्नर फुटवेअरच्या दुकानात आग, लाखोचे नुकसान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011