बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट…बघा, संपूर्ण माहिती

by Gautam Sancheti
ऑगस्ट 20, 2025 | 2:26 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 26

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० ते २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० पर्यंत ३.४ ते ४.४ मीटर तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९ ऑगस्ट रोजीपासून सायं. ५.३० ते २१ ऑगस्ट दुपारी २.३० पर्यंत २.९ ते ४.० मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या कालावधीत संबधित जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, पुणे घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुबई उपनगर, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आले असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, रायगड जिल्ह्यातील अंबा, सावित्री या नद्यांनी धोका पातळी पार केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय सैन्य दलाच्या ७२ जवानांची कंपनी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक, DRF नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत २९३ नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभाग व राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (एनआरएससी) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे SACHET platform चा वापर करून हवामानाचे ४१ अलर्टद्वारे ५४ कोटी एसएमएस च्या नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले आहेत. तर मुंबईत २४ विविध ठिकाणी पाणी साचले होते, पाणी पंपाद्वारे निचरा करण्यात आले आहे. मुंबई येथील असणारी भरती व ओहोटी : ओहोटी – सायंकाळी ४:३५ १.९१ मीटर, भरती रात्री ९:५५ ३.३४ मीटर.

अलमट्टी धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस आणि कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर ब्रिज) मधून होणारा विसर्ग लक्षात घेता, अलमट्टी धरणाकडे येणारा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच, नदीकडे जाणारा प्रवाह सध्याच्या २,००,००० क्युसेकवरून २० ऑगस्ट २०२५ रोजी २,५०,००० क्युसेकपर्यंत वाढवला जाईल.

मुंबई येथील वडाळा ते चेंबूर दरम्यान मोनोरेल मैत्रीपार्क येथे बंद पडली असता राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने समन्वय करून अग्निशमन दलास पाचारण केले व सदर मोनोरेल मध्ये ५८३ प्रवासी सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहेत. सुर्यानगर, विक्रोळी व खिंडीपाडा, भांडूप येथील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांची तात्पुरती निवास व्यवस्था जवळच असणाऱ्या एसआरए इमारतींमध्ये करण्यात आली होती व त्यांच्याकरिता खानपान व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील भोर येथील अंबाडे घाट येथील दरड कोसळली होती परंतु तत्काळ मलबा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील वसई येथे मोरी गावात अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या ७० नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकामार्फत सुखरूप सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड व जलगाव गावतल्या रस्त्यावर पाणी साठल्याणे हा मार्गावरील वाहतुक सुरक्षेस्तव बंद करण्यात आली आहे.

सांगली शहरातील पूरग्रस्त भागातून ४७१ लोकांना बाहेर काढले आहे. पुराचे पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना स्थलांतरित करण्यात आले. बहुतेक लोक त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. काही लोक महानगरपालिकेच्या निवारागृहात देखील असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जळगाव जिल्ह्यात शेतात लावलेल्या विजेच्या तारांच्या शॅाकने एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा मृत्यू

Next Post

६० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून ठाणे येथील दोघांनी नाशिकच्या व्यावसायीकास घातला साडे पाच लाखाला गंडा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
Next Post
crime1

६० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून ठाणे येथील दोघांनी नाशिकच्या व्यावसायीकास घातला साडे पाच लाखाला गंडा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011