माणिकराव खुळे, हवामान तज्ञ
शुक्रवार दि. ११ जुलै पासुन पुढील दोन आठवडे म्हणजे गुरुवार दि. २४ जुलैपर्यन्त मुंबईसह कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात काहींश्या उघडीपीचीच शक्यता जाणवते.
२-मुंबईसह कोकणात ही केवळ मध्यम च पावसाची शक्यता ह्या दोन आठवड्यात जाणवेल.
तर संपूर्ण विदर्भ व सांगली सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात गुरुवार-शुक्रवार दि. १६-१७ जुलै ला दोन दिवस केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
तसेच उत्तर जळगांव जिल्ह्याच्या तालुक्यात आजपासुन ४ दिवस म्हणजे बुधवार दि. १६ जुलै पर्यन्तअगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
३- कश्यामुळे ही पावसाची उघडीप?
बंगालच्या उपसागारात तयार झालेलेले कमी दाब क्षेत्र हे पूर्व भारतात जोरदार पाऊस देत पश्चिम बंगाल व ओरिसातून उत्तर व उत्तर -वायव्येकडे मार्गक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकल्यामुळे ह्या दोन आठवड्यात पावसाचा जोर कमी जाणवत आहे.
ह्या जोडीला जागतिक पातळीवर ही दोन घटना महाराष्ट्रातील पावसासाठी सध्या मारक ठरत आहे.
आज इतकेच!
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.