माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
….
१-सध्याची पावसाची ही स्थिती कश्यामुळे जाणवते?
सध्या कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी ठोस अशी बळकट वातावरणीय प्रणाली जाणवत नाही. अरबी समुद्रात, महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी दरम्यान तटीय हवेचा कमी दाब पट्ट्यामुळे मुंबई व कर्नाटक किनारपट्टी दरम्यान जोरदार पाऊस होत आहे. शिवाय राजस्थान मधील स्ट्रॉंग चक्रीय वाऱ्याच्या प्रणालीमुळे गुजराथ व मध्य प्रदेश मध्ये ही जोरदार पाऊस होत आहे.ह्या तीन्हही ठिकाणच्या जोरदार पावसाच्या प्रेरित परिणामातून नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव येथे सध्या दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
२ -सोयाबीन पेरणी-
पुढील आठवड्यातही कोकणात जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहेच. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मात्र जून महिन्यात म्हणावा असा विशेष अति जोरदार पाऊस अजूनही झालेला नाही. येणाऱ्या आठवड्यात विशेष अश्या जोरदार पावसाची शक्यता जाणवत नाही. सध्याची संचित ओल व उत्तम वाफसा सध्या सोयाबीन पेरणी शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे, पेरणीत चार इंचावर पडणारे सोयाबीनचे बियाणे, सध्याचचा वाहणारा वारा व पडू शकणारे कडक ऊन ह्यामुळे जमीन थरातील सुकणारी वरची खपली आणि बिजांकुरास पडू शकणारे नेट ह्यावर साधारण उतारा मिळेलही, पण त्यानंतर आवश्यक असणाऱ्या पावसाची शक्यता सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे बळजबरी केलेली पेरणी कदाचित फसवी ठरु शकते,. कारण अजुन हा जून महिनाच आहे, ह्याचाही विसर पडू नये, असे वाटते.त्यामुळे २९ जूनच्या आसपास, हवामान अंदाजाचा कानोसा घेऊन कृषी विभागाच्या सल्ल्यासह, जमिनीच्या वरच्या थरात चांगली चिळ-बिळीत ओल आल्यावरच पेरणी करावी. तसाही सोयाबीन पेरणीस अजूनही विशेष उशीर झालेला नाही, असे एकंदरीत वाटते. शेवटी निर्णय आपलाच असावा.
३-मका व कपाशीची लागवड
लागवड झालेल्या व उतरून पडलेल्या मका व कपाशी पिकाला मात्र सिंचन करण्यास हरकत नाही, असे वाटते. वातावरणात काही बदल झाल्यास सूचित करता येईल
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.