माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- गेल्या आठ दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेला मान्सून जाग्यावरच खिळलेला असून त्यात प्रगती नाही. खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजुन मान्सून पोहोचलेला नाही. अजूनही आठ दिवस म्हणजे १९ जूनपर्यन्त पावसासाठी वातावरण विशेष अनुकूल नसले तरी आज व उद्या (७, ८ जून शनिवार, रविवार) आणि १३ जून शुक्रवार असे तीन दिवस नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या जिल्ह्यात व मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे.
विशेषतः वरीलपैकी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यात आजपासून पुढील आठ दिवस म्हणजे शनिवार दि.१४ जूनपर्यंत मृग नक्षत्राच्या मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते.
२- मराठवाड्यातील ८ तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र गुरुवार दि. १२ जून पासून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
३-थोडक्यात १३ जून शुक्रवार पासून मंदावलेल्या मान्सून प्रवाह सक्रिय होवून पुढे वाटचालीस चालना मिळू शकते, असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.