नवी दिल्ली – रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्या मुलांसाठी तिकीट काढण्याच्या संदर्भातले नियम भारतीय रेल्वेने बदलल्याचा दावा करणारी काही वृत्ते अलीकडेच माध्यमांतून प्रसिद्ध झाली आहेत. आता एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांना रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागेल, असा दावा या वृत्तांमधून करण्यात आला आहे.
या बातम्या आणि वृत्ते दिशाभूल करणारी आहेत. भारतीय रेल्वेने रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणार्या मुलांसाठी तिकीट बुकींगच्या संदर्भातील नियमांत कोणतेही बदल केलेले नाहीत. प्रवाशांच्या मागणीनुसार, त्यांना त्यांच्या ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी तिकीट खरेदी करण्याचा आणि बर्थ बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे आणि जर त्यांना वेगळा बर्थ नको असेल, तर तो प्रवास पूर्वीप्रमाणेच विनामूल्य आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या ६ मार्च २०२० च्या परिपत्रकात असे म्हटले आहे की पाच वर्षांखालील मुलांना मोफत नेले जाईल. मात्र स्वतंत्र बर्थ किंवा सीट (चेअर कारमध्ये) दिली जाणार नाही. त्यामुळे जोपर्यंत स्वतंत्र बर्थ मागितला जात नाही तोपर्यंत कोणत्याही तिकीट खरेदीची गरज नाही, पण जर ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बर्थ / सीट ऐच्छिक आधारावर मागितले गेले तर पूर्णपणे प्रौढांसाठीचे भाडे आकारले जाईल.