नवी दिल्ली – येत्या तीन वर्षांत भारतीय रेल्वेला अंत्योदयाच्या रूळावर चालविणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सव्वा महिन्यातच स्पष्ट केले आहे. म्हणजेच रेल्वेमध्ये उच्चश्रेणीच्या प्रवाशांसह सामान्य प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा वाढविण्यात येणार आहेत. रेल्वेच्या तिकीटांना युक्तीसंगत तयार केले जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेस रेल्वेमंत्र्यांचे सर्वोच्च प्रधान्य असेल.
रेल्वेमंत्र्यांनी शनिवारी रेल्वेच्या १७ महाव्यवस्थापक (जीएम) आणि ६८ विभागीय विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत (डीआरएम) प्रथमच चार तासांची मॅरेथॉन बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. रेल्वे अधिकार्यांना त्यांनी प्रधान्याने केल्या जाणार्या कामांची माहिती दिली. शयनयान आणि सामान्य श्रेणींच्या सुविधा आणखी चांगल्या बनविण्याची गरज आहे. या श्रेणीच्या प्रवाशांसाठी अनारक्षित रेल्वे चालविल्या जाणार आहेत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याच्या धोरणांतर्गत सामान्य प्रवाशांना समोर ठेवून कामे केले जाणार आहेत.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, तीन गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यापैकी एक म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्ट अधिकार्यांना स्वतः कारागृहात टाकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आगामी तीन वर्षात भ्रष्टाचार करणार्या अधिकार्यांनी सुधरावे. प्रामाणिक कर्मचार्यांना प्रत्येक ठिकाणी सहकार्य केले जाईल. अधिकार्यांनी देशातील प्रवाशांच्या हिताचा निर्णय घ्यावा. यासाठी धोरणात बदल करायचा असेल तर त्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा. त्याला मान्यता दिली जाईल. रेल्वेच्या सुरक्षेत कसून खपवून घेतला जाणार नाही.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आगामी तीन वर्षांत १५० रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे लक्ष्य ठेवले आहे. रेल्वेने ४०० हून अधिक स्थानकांचा या योजनेत समावेश केला आहे. परंतु ५० स्थानकांच्या मिशन मोडमध्ये विकसित करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या स्थानकांवर प्रवशांच्या सुविधांपासून स्टॉल, फूड कोर्ट, सिटी सेंटर, रेल्वे मॉल, वातानुकूलित अत्याधुनिक वेटिंग रूम, आधुनिक स्वच्छतागृहे आदींची व्यवस्था केली जाणार आहे.