इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावरुन गंभीर आरोप केले आहे. फडणवीस यांनी नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघात विजय मिळवल्यानंतर त्यावर आता प्रश्न उभे करत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त ५ महिन्यांत ८ टक्के वाढ झाली. काही बूथवर २०-५० टक्के वाढ झाली.
बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले. माध्यमांनी पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. आणि निवडणूक आयोग? गप्प – की यात सहभागी. हे काही वेगळे दोष नाहीत. ही मत चोरी आहे. झाकणे ही कबुली आहे. म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
न्यूज लॅान्ड्रींच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधी यांना हा आरोप केला आहे. आता या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातून २०२४ साली फडणवीस ४२ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. त्यांना १ लाख २८ हजार ४०१ मते पडली तर काँग्रेस उमेदवाराला ८९ हजार ६९१ मते पडली. या मतदार संघात ८ वेळा भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपवर केलेला राहुल गांधी यांचा आऱोप कितपत टीकतो हे महत्त्वाचे असणार आहे.