सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोदी धनिकांच्या हातचे बाहुले, राहुल गांधी यांचा आरोप; ‘मित्रां’च्या भल्यासाठी करतात काम

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 15, 2024 | 6:19 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 33

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रांचीः पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांचा आदर करतो, असे सांगतात; पण ते कृषी कर्ज माफ करत नाहीत. मुंबईतील धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला. आम्ही मोदी यांना घाबरत नाही. ते अब्जाधीशांच्या हातचे बाहुले असल्यासारखे काम करत आहेत. ठराविक ‘मित्रां’च्या हितासाठी त्यांचे काम आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

झारखंडमधील ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत राहुल यांनी मोदी यांच्यावर हल्ला चढवला. गोड्डा येथील मेहरामा येथील निवडणूक रॅलीत मोदी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, “मोदी हे अब्जाधीशांच्या हातचे बाहुले झाले आहेत. जे अब्जाधीश म्हणतात तेच मोदी करतात. गरिबांचा पैसा हिसकावून मोदी यांनी अब्जाधीशांचे १६ लाख कोटी रुपये माफ केले आहेत. धारावीत एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानींना दिली. हे सत्य आहे, की महाराष्ट्रातील सरकार केवळ जमीन हडपण्यासाठी पाडण्यात आले आहे.

राहुल गांधी म्हणाले, “मोदी यांनी संविधान वाचले असते तर त्यांनी द्वेष पसरवला नसता. समाजात असंतोष निर्माण झाला नसता. भाजप राज्यघटना कचऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत, अशी टीका करून ते म्हणाले, ” “आमचे ‘प्रेमाची दुकान’ आहे, त्यांचा ‘द्वेषाचा बाजार’ आहे. आम्ही भाजपचा ‘द्वेष आणि हिंसाचार’ प्रेमाने संपवू शकतो.’’ प्रदीर्घ काळापासून जातीनिहाय जनगणनेचा पुरस्कार करणाऱ्या राहुल यांनी जातनिहाय जनगणनेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “जातीवर आधारित जनगणनेमुळे भारताचे चित्र बदलेल. यामध्ये आदिवासी, दलित आणि ओबीसींचे संस्थांमधील स्थान अधोरेखित केले जाईल.

या वर्षाच्या सुरुवातीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचा संदर्भ देत राहुल म्हणाले, की राज्यातील जनतेने निवडून दिलेल्या आदिवासी मुख्यमंत्र्यांना भाजपने तुरुंगात टाकले. आमच्यासमोर विचारधारांची लढाई आहे. काँग्रेस पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडीचे लोक संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत, तर भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यघटनेच्या पुढच्या पानांचा रंग लाल आहे, की अन्य कोणता हे महत्त्वाचा नाही. मोदी यांनी ते वाचले असते, तर सर्वांमध्ये द्वेष पसरवला नसता. आमच्या संविधानात देशाचा आत्मा आहे, त्यात दलितांचा आदर आहे, मागासलेल्यांचा सहभाग आहे. शेतकऱ्यांची आणि मजुरांची स्वप्ने आहेत. भाजप आणि संघाच्या लोकांना ती मिटवायची आहेत; पण जगातील कोणतीही शक्ती राज्यघटना आणि ही स्वप्ने पुसून टाकू शकत नाही

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले. मंजुरी न मिळाल्यामुळे राहुल यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी देण्यात आली नव्हती. महागमामध्ये राहुल यांचे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले आहे. राहुल यांचे हेलिकॉप्टर सुमारे पाऊण तास थांबवले असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधान मोदी आज प्रचारासाठी झारखंडमध्ये होते. त्यांच्या चक्कीमध्ये जाहीर असल्याने राहुल यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी देण्यात आली नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोल्हापूरच्या एकाच कुटुंबातील चौघे…जोधपूरजवळच्या अपघातात ठार

Next Post

या व्यक्तींनी खर्चाचे नियोजन करावे, जाणून घ्या, शनिवार, १६ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Jitendra Awhad
संमिश्र वार्ता

अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती हनुमानजी…अनुराग ठाकुर यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

ऑगस्ट 25, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोहित पवार यांनी पुन्हा मंत्री संजय शिरसाटवर केला हा मोठा गंभीर आरोप….दिले १२ हजार पानांचे पुरावे

ऑगस्ट 25, 2025
प्रातिनिधीक फोटो
संमिश्र वार्ता

दहा वेळा पळून गेलेल्या विवाहित महिलेचा १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याचा प्रस्ताव….बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 25, 2025
anjali damaniya
महत्त्वाच्या बातम्या

९६ मद्य परवाने नेत्यांची कंपन्यांना?…अंजली दमानिया यांनी शासनाच्या धोरणावर केला हा सवाल

ऑगस्ट 25, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या अभ्यासू व आक्रमक नेत्याची निवड….मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

ऑगस्ट 25, 2025
TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी खर्चाचे नियोजन करावे, जाणून घ्या, शनिवार, १६ नोव्हेंबरचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011