मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंजाबमधील टोल बंद होताय… ‘आप’ सरकारने असं काय केलं? महाराष्ट्रात कधी बंद होणार?

by Gautam Sancheti
जानेवारी 9, 2023 | 5:24 am
in राष्ट्रीय
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी टोलबंदीचा धडाका सुरूच ठेवला आहे. होशियारपूर-टांडा महामार्गावरील लाचोवाल टोल प्लाझा आता सरकारने त्याच्या वसुलीचा कार्यकाळ संपल्यामुळे बंद करण्यात आला आहे. आगामी काळात पंजाबमधील बहुतांश टोल बंद करण्यात येणार असल्याचे संकेतदेखील त्यांनी दिले आहेत. टोल बंद केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम पंजाब सरकार करत असून, महाराष्ट्रात अशी पावलं कधी उचलली जातील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टोल वसुलीचा कार्यकाळ संपल्यानंतरही टोल कंपन्यांच्या राजकीय लागेबंधामुळे त्यांच्या वसुलीचा कालावधी सातत्याने वाढवला जात असल्याची परिस्थिती आपल्या देशात आहे. पंजाब सरकारने मात्र त्यावर कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. रस्ते हे लोकांकडून वसूल करण्यात आलेल्या करातून बनवले जातात. त्यांची देखभाल करणाऱ्या कंपन्या यातून बक्कळ पैसा कमावतात, राजकारण्याशी लागेबंध ठेवून वसुलीचा कार्यकाल सातत्याने वाढवून घेतात. त्यामुळे यापुढे पंजाबमधील टोल कंपन्यांचा कार्यकाल वाढवण्यात येणार नाही असं मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जाहीर केलं आहे.

महाराष्ट्रात नेमकी परिस्थिती काय?
महाराष्ट्रात वेळोवेळी टोलविरोधी आंदोलने झाली आहेत. पण टोल व्यवस्थेवर कोणत्याच सरकारने प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट टोलवाल्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी कायदेशीर करारांचं कारण देण्यात आलं. राज्यातील अनेक शहरांमध्ये टोल बंद व्हावेत यासाठी आंदोलने केली गेली. कोल्हापुरात तर टोल कंपनीने रस्त्यांची काम पूर्ण न करताच टोल वसुलीचा प्रयत्न सुरु केला होता. त्यानंतर तो टोल बंद करण्यासाठी मोठं आंदोलन उभं करावं लागलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मधल्या काळात टोलविरोधात आवाज उठवला. त्यानंतर अनेक ठिकाणी टोलविरोधी आंदोलन सुरू झालं. यानंतर राज्यातील ६० टक्के बेकायदेशीर टोल बंद झाल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

राज्यभरातील अनेक टोल नाक्यांवर टोल वसूल केला जातो, मात्र त्या गुणवत्तेचे रस्ते दिले जात नाहीत. तसेच राज्यातील टोल वसुली कंपन्यांना वसुलीसाठी कार्यकाळ सातत्याने वाढवून दिला जातो आणि त्या माध्यमातून प्रवाशांना लुटलं जात आहे. टोल कंपन्या आणि राजकारण्यांचे लागेबंधे असल्यामुळे अनेक कंपन्यांनी वसुलीचा कार्यकाल वाढवून घेतला आणि अमाप संपत्ती मिळवल्याचं दिसून येतंय.

पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर एसटीला सवलत पण…
पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर एसटीला टोलमध्ये सवलत आहे. पण त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या वीस वर्षातील कोणत्याच सरकारने प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या हजारो एसटींना टोल द्यावा लागत असून त्याचा भूर्दंड महामंडळाला आणि पर्यायाने प्रवाशांना बसतोय. समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी १० डिसेंबर २०३२ पर्यंत म्हणजेच पुढील तब्बल दहा वर्षे टोल आकारला जाणार आहे. ज्यात कार, जीप, व्हॅन या हलक्या वाहनांना १० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रति कि.मी. १.७३ रुपये टोल आकारला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होऊन शेवटच्या दीड वर्षात २.९२ रुपये प्रति कि.मी. या दराने पथकर आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच औरंगाबाद ते शिर्डी या एका तासाच्या प्रवासासाठी १७० रुपये टोल द्यावा लागणार आहे.

Punjab AAP Government Toll Plaza Being Closed
Maharashtra Road Construction Taxes

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तिशीच्या आत लग्न का केलं? अभिनेत्री अनुुष्का शर्माने सांगितलं हे कारण….

Next Post

येवल्यात नायलॉन मांज्यामुळे आणखी दोन मुली जखमी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
andolan 1
राज्य

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते करणार विदर्भ दौरा…आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराशी साधणार संवाद

सप्टेंबर 8, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू, २५० हून अधिक लोक जखमी

सप्टेंबर 8, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

आता राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम…

सप्टेंबर 8, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी कमी जीएसटी दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवणार….

सप्टेंबर 8, 2025
NMC Nashik 1
संमिश्र वार्ता

नाशिक महानगरपालिकेत प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सुचना अर्जावर या तारखेला होणार सुनावणी

सप्टेंबर 8, 2025
Untitled 3
मुख्य बातमी

मुंबईत उध्दव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक…विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 8, 2025
Next Post
IMG 20230108 WA0242

येवल्यात नायलॉन मांज्यामुळे आणखी दोन मुली जखमी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011