मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गडचिरोलीत प्रियंका गांधी यांची सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका

नोव्हेंबर 17, 2024 | 6:48 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 43

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गडचिरोलीः काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर टीका केली. काही मोठे प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या नोकऱ्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी आघाडीचे नेते मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्या म्हणाल्या.

गडचिरोली जिल्ह्यातील एका मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्यातील महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली. महिलांनी चांगल्या आयुष्यासाठी मतदान केले पाहिजे, त्यांना दरमहा १,५०० रुपये मिळतात म्हणून नव्हे, असे सांगून महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सात हजार रुपये हमी भाव देण्याचे त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याचा दावा गांधी यांनी केला. फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यामुळे राज्यातील नोकऱ्या गेल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

युवक प्रयत्न करत आहेत, नवीन कौशल्ये शिकत आहेत; पण तरीही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. याकडे सरकारचे प्राथमिक लक्ष असायला हवे होते; परंतु ही पदे भरण्यात अपयश आले आहे, अशी टीका करून प्रियंका म्हणाल्या, की महाराष्ट्रातील तरुणांच्या आत्महत्येचा संबंध रोजगाराच्या संधींच्या अभावाशी आहे. देशात सर्वाधिक तरुणांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. त्याचे कारण बेरोजगारी हटवण्यात भाजपच्या अपयशाचा हा परिणाम आहे. विमानतळ, बंदरे आणि काही मोठ्या कंपन्या यासारखी प्रमुख क्षेत्रे अदानीच्या नियंत्रणाखाली आहेत आणि सरकारी धोरणे एका व्यक्तीच्या बाजूने राबविली जात आहेत. सरकारने रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय संपत्तीचे वाटप करू नये. कारभारात उत्तरदायित्व नसल्याचा आरोप करीत त्यांनी भाजपवर टीका केली.

त्या म्हणाल्या की काँग्रेसच्या राजवटीत आमचे नेते जनतेला जबाबदार होते; मात्र भाजपच्या राजवटीत ही जबाबदारी संपली आहे. मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आता जनतेला जबाबदार राहिलेले नाहीत. अदानींच्या कंपन्यांना छत्तीसगडसारख्या राज्यात आदिवासींच्या जमिनी दिल्या जात असल्याचा मुद्दाही प्रियंका यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सत्तेवर आली, तर रोजगार निर्मिती आणि लोकांना मदत देण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असे घोषवाक्य वापरले. त्याचा समाचार प्रियंका यांनी घेतला. ‘सेफ’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत, सुरक्षा आणि खजिना. या देशात अदानी ही एकमेव व्यक्ती खरोखर सुरक्षित आहे. संपूर्ण देशाला माहीत आहे, की अदानी ही एकमेव व्यक्ती आहे, जिला सरकारी तिजोरीत प्रवेश आहे, तर सामान्य नागरिक संघर्ष करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य; समर्थकांत नाराजी

Next Post

प्रतिभा पवार संतापल्या, बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटवरच अर्धा तास रोखले

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
Untitled 44

प्रतिभा पवार संतापल्या, बारामती टेस्कटाईल पार्कच्या गेटवरच अर्धा तास रोखले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011