बुधवार, सप्टेंबर 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे वितरीत; तुमच्या खात्यात जमा झाले का ?

by Gautam Sancheti
मे 14, 2021 | 10:46 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
k

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वितरीत करण्यात आला. आज एकाच वेळी या योजनेच्या ९ कोटी ५० लाख ६७ हजार ६०१ लाभार्थ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी काही लाभार्थी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. केंद्रीय कृषीमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांशी बोलतांना पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशातील उन्नाव च्या अरविंद या शेतकरी बांधवाचे कौतुक केले. आपल्या प्रदेशातील युवा शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण आणि शेतीसाठी नवे तंत्रज्ञान शिकवण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधान म्हणाले. अंदमान-निकोबार बेटांवरील कार निकोबारचे पॅट्रीक मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती करतात, त्यांचाही पंतप्रधानांनी गौरव केला. आंध्रप्रदेशातील अनंतपूर इथल्या एन वेणुरामा यांनी आपल्या परिसरातल्या १७० पेक्षा अधिक आदिवासी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले आहे, असे सांगत, त्यांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
मेघालयचे रँवित्झर मेघालयातील डोंगराळ भागात आले, हळद, दालचिनी इत्यादी मसाल्याच्या पिकांचे उत्पादन करतात. त्यासोबतच, पंतप्रधानांनी श्रीनगरच्या खुर्शीद अहमद यांच्याशीही संवाद साधला. अहमद, शिमला मिरची, मिरची, आणि काकडी अशा फळभाज्यांची सेंद्रिय शेती करतात.
पहिल्यांदाच पश्चिम बंगालमधल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे, असे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना महामारीच्या संकटकाळात देखील अडचणींवर मात करत अन्नधान्य आणि फळे-भाजीपाला यांचे विक्रमी उत्पादन केल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारही दरवर्षी किमान हमीभावानुसार धान्यखरेदी करण्याचे नवनवे विक्रम रचत आहे, असे मोदी म्हणाले. किमान हमीभावानुसार धान खरेदीचा विक्रम याआधीच झाला आहे. आणि आता गहू खरेदीचाही नवा उच्चांक निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले. यंदा आतापर्यंत हमीभावानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत, 10 टक्के अधिक गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत गहू खरेदीची ८ हजार कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली.
केंद्र सरकार शेतीमध्ये नवीन उपाय योजना आणि नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा सातत्याने  प्रयत्न करत आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे हा देखील अशा प्रयत्नांपैकी एक आहे. सेंद्रिय शेतीमुळे अधिकाधिक नफा मिळतो आणि आता देशभरातील तरूण शेतकरीही याकडे वळले आहेत. ते म्हणाले की, आता गंगा नदीच्या दोन्ही बाजूच्या काठांवर  आणि सुमारे ५ किलोमीटर परीघ क्षेत्रात सेंद्रिय शेती केली जात आहे, जेणेकरून गंगा नदी स्वच्छ राहील.
या कोविड महामारीच्या काळात किसान क्रेडिट कार्डची मुदत वाढवण्यात आली असून आता ३० जूनपर्यंत हप्त्यांचे नूतनीकरण करता येईल यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, अलिकडच्या वर्षांत २ कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्डे जारी करण्यात आली आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, शतकातून एकदा येणाऱ्या महामारीने संपूर्ण जगासमोर आव्हान उभे केले असून आपल्यासमोर हा अदृश्य शत्रू आहे. ते म्हणाले की, सरकार कोविड -19 विरुद्ध आपल्या सर्व सामर्थ्यानिशी लढा देत आहे आणि प्रत्येक सरकारी विभाग राष्ट्राच्या वेदना दूर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत आहे.
अधिकाधिक देशवासियांचे वेगाने लसीकरण करता यावे यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, आतापर्यंत देशभरात सुमारे 18 कोटी लसींच्या मात्रा  देण्यात आल्या  आहेत. देशभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये  मोफत लसीकरण केले जात आहे. प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी आणि नेहमी कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाचा अवलंब करावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. ते पुढे म्हणाले की, ही लस कोरोनापासून संरक्षण करण्याचे महत्त्वाचे साधन आहे आणि यामुळे गंभीर आजाराचा धोका कमी होईल.
पंतप्रधान म्हणाले की, या कठीण काळात ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सशस्त्र दल पूर्ण ताकदीने काम करत आहे.  रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्या चालवत आहे. देशातील औषध निर्मिती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर  औषधांचे उत्पादन आणि वितरण करत आहे. औषधे व वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक कायदे करण्याची विनंती पंतप्रधानांनी राज्य सरकारांना केली.
भारत हा कठीण परिस्थितीत आशा सोडून देणारा देश नाही, असे सांगत  पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की या आव्हानावर पूर्ण सामर्थ्याने आणि समर्पित भावनेने मात होईल. त्यांनी ग्रामीण भागातही कोविड -19 चा प्रसार होत असल्याबाबत इशारा दिला आणि ग्रामपंचायतींना आपापल्या भागात योग्य जागरूकता व स्वच्छता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लस कमी पोस्टर जास्त! ‘मातोश्री’च्या परिसरातच काँग्रेस आमदाराकडून शिवसेना लक्ष्य

Next Post

केंद्राकडून येत्या १५ दिवसात राज्यांना मिळणार एवढ्या लस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
crime114
क्राईम डायरी

कर्जदारास बंदुकीचा धाक दाखवून सावकाराने केले अपहरण…व्याजासह मुद्दल परत करुनही घडला प्रकार

सप्टेंबर 17, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
संमिश्र वार्ता

राज ठाकरे यांनी अमित शाह, जय शाह यांचे प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून केला हल्लाबोल…

सप्टेंबर 17, 2025
e vidhya 1024x275 1 e1758078658915
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व…तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या

सप्टेंबर 17, 2025
eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान…प्रत्येक उद्यानासाठी १ कोटीचा निधी

सप्टेंबर 17, 2025
FB IMG 1758073921656 e1758074047317
संमिश्र वार्ता

कोकणच्या सौंदर्याचा ‘दशावतार’…बॉक्स ऑफीसवर तुफान हीट…

सप्टेंबर 17, 2025
कांद्याच्या भावासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी बैठक 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी….पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सप्टेंबर 17, 2025
Next Post
प्रातिनिधीक फोटो

केंद्राकडून येत्या १५ दिवसात राज्यांना मिळणार एवढ्या लस

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011