शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यामागे राष्ट्रपतीपद निवडणूक

जून 24, 2022 | 10:53 am
in संमिश्र वार्ता
0
Draupadi murmu

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – असे म्हणतात की, प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असते. सध्या देखील महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच परिस्थिती जाणवत आहे, सर्व नीती नियम आणि कायदे बाजूला ठेवतच सत्ता हस्तांतरणासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येते. शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांनी ४२ पेक्षा जास्त आमदारांचा गट तयार केला आहे. भाजपच्या मदतीने सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यामागे राष्ट्रपती पद निवडणूक असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

खरगे म्हणाले की, भाजपला काहीही करुन राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकायची आहे. यासाठी भाजपने आता महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपला राष्ट्रपती पदासाठी आकडा हवा आहे. राष्ट्रपती पद निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराचा दणदणीत विजय व्हावा यासाठीचे संख्याबळ वाढविण्यावर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. पण भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे मला वाटते असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

विशेष म्हणजे गोवा, कर्नाटक, मणिपूर, मध्यप्रदेश, उत्तराखंड या राज्यातही या अगोदर असेच प्रयत्न झाले आहेत, अशाच पद्धतीने त्यांनी सरकार पाडले आहेत. आमदारांना ईडीची भीती दाखवून त्यांना फोडले जातात. महाराष्ट्रातही सध्या हेच सुरू आहे, पण ते महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही, असेही खरगेही म्हणाले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महाराष्ट्रात भाजपचा सत्तेसाठी खेळ चालला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. महाराष्ट्रात अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारचा नीट कारभार सुरू असताना ते अचानक अस्थिर कसे झाले? त्यामागे भाजपचे षड्यंत्र आहे, असा आरोप खरगे यांनी केला.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेच्या ४२ पेक्षा अधिक आमदारांनी बंड केल्याचे सांगण्यात येत आहे. या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळून निघाले. शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडावरुन आता भाजपवर आरोप सुरु झाले असून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर टिका केली आहे.

खरगे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरु आहेत, त्यामागे भाजपचा हात आहे. कारण भाजपच स्थिर सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आमदारांना सूरतवरुन गुवाहाटीला घेऊन गेले. याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातील भाजप सरकार आहे. परंतु महाराष्ट्रात बहुमताचे सरकार आहे. भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन याचा मुकाबला करायला तयार आहोत. शिवसेनेचे बंडखोर आमदार परत येतील व समस्येतून मार्ग निघेल, अशी आपेक्षा खरगे यांनी व्यक्त केली आहे.

president election bjp strategy maharashtra government politics Maharashtra political crisis

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोट्यवधीची संपत्ती जप्त झाल्याने शिवसेनेचे हे तीन नेते झाले बंंडखोर

Next Post

वाढता वाढता वाढे! शिंदे गट राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा ठरणार? काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’लाही टाकणार मागे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
guwahati1

वाढता वाढता वाढे! शिंदे गट राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा ठरणार? काँग्रेस, 'राष्ट्रवादी'लाही टाकणार मागे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011