इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापा-यावर झालेल्या हल्ल्यानंतर व्यापा-यांनी पुकारलेल्या बंदला प्रत्त्युत्तर देण्यासाठी मनसेनेही मोर्चा काढण्याचा आज निर्णय घेतला होता. पण, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारुन मनसे नेत्यांना रात्रीच अटक केली. त्यानंतरही मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यामुळे मीरा – भाईंदरमधील वातावरण तणावपूर्ण आहे. येथे मराठी – अमराठी मुद्दा या मोर्चामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. या मोर्चाला अडवल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक हे मोर्चात सामील होण्यासाठी गेले. पण, येथे त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. त्यानंतर ते मोर्चातून पाच मिनिटांतच माघारी फिरले. आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ते म्हणाले की, मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या आवाजासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह सहभागी झालो. मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी आहे. मीरा भाईंदर मधील मराठी माणसाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा असेन. मला कुणीही अडवलं नाही, मला अडवणा-याला भीक घालत नाही. अशांना तोंड द्यायला समर्थक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अगोदर मोर्चा अडवला नंतर परवाणगी
मराठी मुद्दयावरुन निघालेल्या या मोर्चाला अगोदर परवाणगी नाकारण्यात आली. मनसेच्या काही नेत्यांनी रात्रीच अटक केली. या मोर्चासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. आंदोनकर्त्यांना अडवले. तर काहींना पोलिसांनी जबदरदस्तीने व्हॅनमध्ये बसवले आहे. व्यापा-यांच्या मोर्चावेळी कायदा का नाही, अमराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी दिली मग आम्हाला का नाही असा प्रश्नही विचारला जात होता. या सर्व घडामोडीनंतर तब्बल चार तासाच्या राड्यानंतर मोर्चाला परवाणगी देण्यात आली. ज्यांनी अटक करण्यात आली. त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर हा भव्या मोर्चा झाला. यात मराठी एकीकरण, मनसे व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांची कालपर्यंत मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार त्या रुटबाबत चर्चा सुरु होती. मनसे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल असा रुट मागत होते. पण, पोलिस त्यांना नेहमीच रुट घ्या असे सांगत होते. मात्र, मनसेने त्याला नकार दिला. त्यामुळे परवानगी नाकारली.
हे सरकार महाराष्ट्राचं आहे का गुजरातचं?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्च्याला परवानगी नाही… हे सरकार महाराष्ट्राचं आहे का गुजरातचं ? आमच्या नेत्यांना अटक करून मोर्चा थांबेल आणि विषय मागे पडेल असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी त्या भ्रमात राहू नये. मराठी माणूसच आता या मोर्च्याचे नेतृत्व करेल.