गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

युक्रेन युद्ध थांबवल्याचा दावा करणारे मणिपूर का शांत करत नाहीत? मणिपूर सोडून अमेरिकेला का जाताय? उद्धव ठाकरेंचा मोदींवर जोरदार हल्लाबोल

by Gautam Sancheti
जून 19, 2023 | 5:12 am
in संमिश्र वार्ता
0
uddhav thakre sabha

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर आणि समान नागरी संहिता कायद्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मणिपूर जळतंय. तेथे नागरिक जीव मुठीत धरुन रहाताय आणि पंतप्रधान मणिपूरला जात नसून ते अमेरिकेला जात आहेत. भाजप जर देशात गोहत्याबंदी कायदा लागू करू शकत नसेल तर समान नागरी कायदा कसा लागू करणार, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

शिवसेना (उद्धव गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीला संबोधित केले. ठाकरे म्हणाले की, मणिपूर जळत आहे. तिथे हिंसाचार उसळला आहे. मात्र तिथे जाण्याऐवजी पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. राज्यात सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले नाहीत. आपण रशिया-युक्रेन युद्ध शांत केल्याचा दावा पंतप्रधान करतात, मग ते मणिपूरमधील हिंसाचार का थांबवत नाहीत. जर पंतप्रधानांनी राज्यात शांतता प्रस्थापित केली तर आपण त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवू शकतो, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या अंतर्गत पाटणा येथे होणाऱ्या बैठकीला आपणही उपस्थित राहणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. २३ जून रोजी होणारी बैठक ही केवळ विरोधी पक्षांची बैठक नसून ती देशावर प्रेम करणाऱ्या लोकांची सभा आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या लोकांची सभा आहे. देशभक्तांची बैठक आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार स्वतः मातोश्रीवर आले होते. नितीशकुमार यांनी मला बैठकीसाठी बोलावले. पूर्वी फक्त भाजप नेते मातोश्री यायचे. आता भाजप वगळता सर्व नेते मातोश्रीवर येतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

जम्मू-काश्मीरबाबत ठाकरे म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी राज्यातून कलम ३७० हटवण्यात आले होते. पण तिथे आजवर निवडणुका का झाल्या नाहीत? आजही तिथे हिंदूंना धोका का आहे? त्याचवेळी, समान नागरी संहितेबाबत ते म्हणाले की, जर ते देशात गोहत्येविरोधातील कायदा लागू करू शकत नसतील, तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी कशी होणार. विधी आयोगाने अलीकडेच यावर विचार करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये धार्मिक आणि सामाजिक संघटनांचे लोक सहभागी होतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाचखोर आयएएस अनिल रामोड प्रकरणात समोर आला नवीन अँगल

Next Post

तुम्ही दररोज ब्रेड खाताय? आधी हे वाचाच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
Milk Bread

तुम्ही दररोज ब्रेड खाताय? आधी हे वाचाच

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011