शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एकनाथ खडसेंनी शिंदे गटाला अशा कडक शब्दात सुनावले

सप्टेंबर 15, 2022 | 9:21 pm
in राज्य
0
eknath khadse e1659087219748

 

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आणि शिंदे गटाला कडक शब्दात फटकारण्याचे काम सुरू केले आहे. खडसे म्हणाले की, “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असे म्हणत शिंदे गटावर घणाघात केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडे राजकारण कधी झाले नव्हते. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती असेही म्हटले आहे. यासोबतच धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे, असे म्हणत निशाणा साधला आहे.

खडसे पुढे म्हणाले की, राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यात झालेले फेरबदल जनतेला फार काही आवडलेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं. खोक्यांची भाषा कधी झाली नव्हती. निवडणुका विचाराने लढल्या जायच्या. अलीकडे हे सरकार पाडायच, ते पाडायचं हेच चाललं आहे” असं टीकास्त्र एकनाथ खडसे यांनी सोडलं आहे.
त्यातच आपल्या जिल्ह्यातील ५ आमदार शिंदेंच्या गटात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली, घडवली. धनुष्यबाणाच्या जोरावर, बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याशी धोका देऊन दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही” असंही खडसेंनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असं म्हटलं आहे.

खडसे म्हणाले की, आजपर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली. त्यामुळे त्यांचा निर्णय पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा होता. त्याचप्रमाणे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अनेकदा शिवसेनेवर खालच्या पातळीवरचे आरोप केले. मात्र याला जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही. गुलाबराव पाटील यांनी कधीही गिरीश महाजन यांच्यावर टीका केली नाही. दोन्ही गोष्टींवरून असे सिद्ध होते की या बंडखोर आमदारांच्या मनात आताच नव्हे तर पूर्वीपासूनच भाजपसोबत जाण्याचा विचार होता आणि तेच आता सर्व जगाच्या समोर आलं आहे,’ असा हल्लाबोल खडसे यांनी केला होता.

खडसेंनी टीका केली की, तुम्ही २०० कोटीच काय ६०० कोटी आणले असतील पण तत्त्व आणि सत्त्व शिल्लक राहिले नाही. पण निष्ठा शिल्लक नसेल तर २०० कोटी आणले काय आणि ६०० कोटी आणले, त्याला काय अर्थ आहे? पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असं म्हणत टीका केली आहे. तसेच आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे हा दृष्टीने काम करायचं आहे. हा मतदारसंघ पिंजून काढायचा आहे असेही खडसे यांनी म्हटले आहे.

खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात मी सातत्याने ३० वर्ष निवडून आलोय आणि आता पुन्हा ६ वर्षासाठी आमदार झालोय. त्यामुळे ३६ वर्ष जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. नाथाभाऊला नाउमेद केल्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही हे विरोधकांना माहिती आहे. जिल्हा बँका, जिल्हा दूध संघ अनेक ठिकाणी विरोधकांना अपयश आले असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत सारे विरोधक एकवटून नाथाभाऊला विरोध करणे हेच एकमेव काम विरोधकांकडे उरलं आहे. परंतु जोपर्यंत जनता खडसेंच्या पाठिशी आहे तोपर्यंत सारे एकत्र आले तरी या विरोधकांना यश येणार नाही असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.

नाथाभाऊंनी विकास कामे केले तेव्हा तुम्हाला जाग का आली नाही? मुक्ताईनगरचे आमदार हे कोणाच्या भरोशावर निवडून गेले हे तुम्ही एक मुखाने सांगा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीविषयी आणि त्यांना निवडून आणण्याता कुणाचा वाटा होतो हे सांगताना खडसे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमदार करण्यासाठी मदत केली आहे, आता उद्धव ठाकरे यांना सोडून तुम्ही एकनाथ शिंदे गटकडे गेला आहात मग गद्दारी कोणी केली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मी गेले ४० वर्ष आमदार आहे तर चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीला केवळ तीन वर्षे झाले आहेत आणि आता अचानक करोडो रुपयांच्या गाड्या घोड्या कशा येतात, असा सवाल उपस्थित करत ओके कोणाचे आणि खोके कोणाचे हे जनतेला माहिती असल्याचे म्हणत खडसेंनी उत्तर दिले आहे.

Politics NCP Leader Eknath Khadse on Rebel Shinde Group

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राष्ट्र पुरुष, थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिनाबाबत निर्देश; परिपत्रक जारी

Next Post

या तालुक्यातील ९ सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
1 e1663257260731

या तालुक्यातील ९ सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011