नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे की शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार. म्हणजेच, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकत्र येणार आहेत. आता यासंदर्भात आंबेडकर यांनीच स्पष्ट खुलासा केला आहे. ते म्हणाले की, आम्हाला घ्यायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंधच येत नाही. आम्हाला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या महामोर्चाबाबत ते म्हणाले की, हा मोर्चा खरा शिवसेनेचा आहे, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. उद्धव ठाकरे यांनी फक्त असे कळवले होते की, ‘आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घायचा विचार करू’ मात्र अजित पवार म्हणाले की, ‘हा प्रश्न अजून विचाराधीन आहे याचा अर्थ नाही असा होतो, असेही ते म्हणाले.
आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे, त्यांना गरीब मराठा देखील चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी भेटायला गेलो नाही. ते स्वतः राजगृहावर भेटायला आले. एक कुटुंब म्हणून आम्ही स्वागत केलं, इंदू मिल संदर्भात विषयांवर चर्चा झाली. एक गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. महापुरुषांनी आदर्श समाजात ठेवला आहे. -भाजपचा सामाजिक आणि राजकीय लढ्यात सहभाग नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सिम्बॉल्स नाही. त्यामुळे जे सिम्बॉल्स आहे, त्याला काळे भासण्याचे काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
Politics Leader Prakash Ambedkar on Shivsena Alliance