गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिवसेना आणि भाजप युती का तुटली? त्यावेळी नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांनी सगळं सविस्तर सांगितलं…. (Video)

नोव्हेंबर 16, 2022 | 5:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे. खरे म्हणजे आम्ही युती करण्यास तयार होतो, पण शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत बेईमानी केल्याने त्यांची जागा दाखवण्यात आली, अशी कठोर टीका फडणवीस यांनी केली आहे.

सध्या शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता दुसरीकडे, अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात सुमारे साडेचार महिन्यापुर्वी शिवसेनेत उभी फुट पडून मोठी बंडखोरी झाली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिंदे गट निर्माण केला तसेच भाजपाने एकत्रित येऊन सत्तास्थापना केली. असा प्रकार अचानक कसा घडला ? यामागचा खरा सूत्रधार कोण ? असा अनेक चर्चा मधल्या काळात रंगल्या. याच संदर्भात आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कबुली दिली. ‘विचार पुष्प’ पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील सदर पुस्तक आहे. यावेळी शाह यांचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि अमित शाह यांच्या आत्मविश्वासामुळेच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात यश आले. अमित शाहंच्या विचारात प्रगल्भता आहे. छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि चाणक्य यांना मानणारे ते नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता तर आहेच, पण निर्णय घेण्याची क्षमताही प्रचंड आहे.

राज्यात झालेला सत्ता बदल सर्वांनी पाहिला आहे. शिवसेनेच्या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्यात आली. तसेच बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र आली. या परिवर्तन काळात एक नेता ताकदीने आपल्या पाठिशी होता. त्या नेत्यावर आज एक पुस्तक प्रकाशन होत आहे, असेही फडणवीस म्हणाले. सन २०१४ मध्ये मिळालेले यश मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शाह यांच्या कर्त्तृत्वामुळे आहे. राजकारणातील चाणक्य ही उपमा याच निवडणुकीमुळे मिळाली. याच कार्यालयात अमित भाई राहायचे त्यांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली. त्याआधी शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली. ११८ जागा लढणाऱ्या भाजपने २८८ जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा केला.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1592393412073779201?s=20&t=kIeDzPtFeLqpJeHKdRQacg

Politics Bjp Devendra Fadanvis On Shivsena Alliance Breakup

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

अभिनेत्री शिल्पा तुळसकरला बॉयफ्रेंड होता का? तिनेच सांगितला खासगी आयुष्यातील ‘तो’ किस्सा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
Shilpa Tulaskar

अभिनेत्री शिल्पा तुळसकरला बॉयफ्रेंड होता का? तिनेच सांगितला खासगी आयुष्यातील 'तो' किस्सा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011