शनिवार, ऑगस्ट 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजित पवारांनी संजय राऊतांना दिले हे कडक उत्तर!

by Gautam Sancheti
मे 9, 2023 | 11:37 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
ajit pawar 111

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली तरीही संजय राऊत ‘सामना’मध्ये लिहीताना हात आखुडते घेताना दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांचा मित्रपक्ष असला तरीही त्यांनी अद्याप अजित पवार यांच्यावरील टीका थांबविलेली नाही. पण त्यावर आता अजित पवार यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड होणार आहे, याची केवळ चुणचुण लागलेली असतानाच संजय राऊत यांनी तलवार उगारून अजित पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे अस्वस्थता वाढलेली होती. दरम्यान, अनेक घडामोडी घडल्या आणि आता अजित पवार आपल्या समर्थित आमदारांसह भाजपमध्ये जाणार आहेत, असे पूर्ण चित्र असतानाच शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सगळाच फोकस बदलला. यात अजित पवार यांची कोंडी झाल्याचे विश्लेषण करण्यात आले.

शरद पवार यांच्या राजीनाम्याचा विषय संपलेला आहे, असे राष्ट्रवादीकडून वारंवार सांगण्यात आल्यानंतरही अद्याप त्यावरचे राजकारण थांबलेले नाही. पण यातच संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये अग्रलेख लिहून अजित पवार यांना पुन्हा एकदा डिवचले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपमध्ये जाण्याचा बॅगा भरून तयार असल्याचे भाष्य संजय राऊत यांनी अग्रलेखातून केले आहे.

ईडी, सीबीआयसह इतर तपास यंत्रणांच्या भीतीपोटी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत होता. पण शरद पवारांनी राजीनामा देत बंडखोरीची योजना हाणून पाडली, अशा आशयाची टीका संजय राऊतांनी अग्रलेखातून केली. त्यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या मताला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. ‘एखादी व्यक्ती मनाला वाटेल तसे काहीही बोलत असेल तर त्यांच्या मताला महत्त्व देण्याचे काहीही कारण नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांचं मत म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं मत असू शकत नाही,’ असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.

जेवढी माणसं तेवढी मतं
त्यांनी अग्रलेखातून त्यांचं मत मांडलं आहे. ते वैय्यक्तिक मत आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एकदा सांगितल्यानंतरही जर त्यांना मनाला वाटेल ते बोलायचं असेल, तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. जेवढी माणसं तेवढी मतं असू शकतात, असेही अजित पवार म्हणाले. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Politics Ajit Pawar Reaction on Sanjay Raut

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीरमचे संचालक पुनावाला अडचणीत! ईडीने जप्त केली तब्बल ४२ कोटींची मालमत्ता… हे आहे प्रकरण

Next Post

कृषी विभाग राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर; यांना मिळाला ५० हजाराचा पुरस्कार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
agriculture

कृषी विभाग राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर; यांना मिळाला ५० हजाराचा पुरस्कार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मतभेदांचे प्रसंग टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0420 1

अपघातग्रस्त शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले शालेय शिक्षण मंत्री

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0425 2

महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित, एकाचा शोध सुरू. उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद

ऑगस्ट 8, 2025
IMG 20250808 WA0395 1

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 8, 2025
INDIA GOVERMENT

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकार सक्रिय…केल्या या उपाययोजना

ऑगस्ट 8, 2025
ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011