इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पोलिस हे जनतेचे रक्षक समजले जातात, सर्वसामान्य जनतेचे रक्षण करत असताना गुंड आणि समाज विघातक कृत्य करणाऱ्या करणाऱ्यांना धडा शिकविण्याचे काम पोलिसांकडून केले केले जाते. समाजात कोणताही ताण-तणाव किंवा वाद होऊ नये तसेच हाणामारी होऊ नये यासाठी पोलीस काळजी घेतात किंवा तसा प्रकार घडल्यास प्रकार घडल्यास तात्काळ कारवाई करण्यात येते. परंतु पोलीसच हाणामारी करत असेल तर काय होईल, मात्र असा प्रकार उस्मानाबाद शहरात घडला.
खुद्द पोलिस अधीक्षक कार्यालयातच दोन पोलिसांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून एका पोलिस अधिकाऱ्याने दुसऱ्या पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा सुरू आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक नरसिंग कासेवाड यांनी कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक मच्छिंद्र कृष्णा जाधव यांना कार्यालयातच मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली झालेल्या पोलीस अंमलदार यांच्याबाबत निनावी तक्रारी अर्ज आला होता. त्या अनुशंघाने नरसिंग यांनी मच्छिंद्र जाधव यांना काल जबाब दयायला सांगितला होता. म्हणून वरिष्ठ लिपिक मच्छींद्र जाधव यांनी नरसिंग यांच्याकडे सदर अर्जाची प्रत व पत्र मागितले असता नरसिंग यांनी मच्छींद्र जाधव यांना मारहाण करायला सुरुवात केली.
लाथा बुक्क्यानी मारहाण करत पत्र व्यवहार शाखेत नेले तेथे मारहाण केली. विशेष म्हणजे यावेळी दोन सहकार्यांनी मध्यस्थी करत मारहाण करु नका म्हणून सांगत होते. मात्र, नरसिंग ऐकत नव्हते तर मच्छिंद्र जाधव हे नरसिंग यांना मला मारहाण करु नका म्हणून विनवणी करत होते. या दरम्यान नरसिंग यांनी मच्छिंद्र यांना शिवीगाळ केली. ‘तुला जिवंत सोडणार नाही मी आय जी साहेब औरंगाबाद यांना व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन तुझी वाट लावतो. असे म्हणत नरसिंग कासेवाड यांनी लिपिक मच्छींद्र जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, मच्छिंद्र जाधव यांनी कार्यालयीन अधिक्षक नरसिंग कासेवाड यांच्याविरूद्ध आनंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.