सोमवार, ऑक्टोबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली…मोदी यांचा गांधी घराणे व काँग्रेसवर आरोप

नोव्हेंबर 9, 2024 | 11:06 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
modi 111

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोला/नांदेडः अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात निवडणुका आहेत आणि कर्नाटकात वसुली होत आहे. या लोकांनी कर्नाटकातील दारू दुकानदारांकडून ७०० कोटी रुपये वसूल केले, असा आरोप करताना महाराष्ट्राला या घोटाळेबाजांचे एटीएम होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मोदी म्हणाले, की जिथे काँग्रेसचे सरकार बनते, ते राज्य काँग्रेसच्या राजघराण्याचे एटीएम बनते. आजकाल हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक हे काँग्रेसच्या राजघराण्याचे ‘एटीएम’ बनले आहेत. येथील वसुली दुपटीने वाढली आहे. घोटाळ्यांच्या माध्यमातून निवडणूक लढवणारा काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करेल याची तुम्ही कल्पना करू शकता. महाराष्ट्राचा आशीर्वाद भाजपवर आहे. महाराष्ट्रात आपल्याला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. महाआघाडीच्या बड्या घोटाळेबाजांचे महाराष्ट्र आम्ही एटीएम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची सेवा करण्याचा आनंद वेगळाच आहे. केंद्रात माझे सरकार येऊन केवळ पाच महिने झाले आहेत. या पाच महिन्यांत आम्ही महाराष्ट्रात अनेक योजना सुरू केल्या आहेत. गेल्या दोन टर्ममध्ये ४ कोटी घरे बांधली गेली. गरिबांसाठी आणखी ३ कोटी नवीन घरे बांधली जातील. महाराष्ट्रातील गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

महायुतीचे सरकार महाराष्ट्राचा विकास दुप्पट वेगाने पुढे नेणार आहे. आमच्यासाठी राष्ट्राची भावना ही सर्वात महत्त्वाची आहे. प्रथम राष्ट्राची भावना ही भारताची खरी ताकद आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की काँग्रेसला वेगवेगळ्या जातींमध्ये लढायचे आहे. देश जितका कमकुवत असेल तितकी काँग्रेस मजबूत होईल, हे काँग्रेस पक्षाला माहीत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या जातींना आपसात लढवायचे आहे आणि हा काँग्रेसचा स्वभाव आहे. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने आमच्या दलित समाजाला कधीही एकत्र येऊ दिले नाही. एसटी समाजाला विविध जातींमध्ये विभागून ठेवले. ओबीसी हे नाव ऐकताच काँग्रेस चिडते. ओबीसी समाजाला वेगळी ओळख देऊ नये, त्यामुळेच काँग्रेसने विविध खेळ खेळले आहेत, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने एकापेक्षा एक घोटाळे केले. काँग्रेसने फसवणुकीत स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. काँग्रेसवाले देशात बाबासाहेबाचे नाही स्वतःच संविधान चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस वेगळी पुस्तिका दाखवून संविधानाची चेष्टा करीत आहेत. काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा तिटकारा आहे. संविधानासोबत सगळ्यात पहिला विश्वासघात काश्मीरमध्ये केला होता, अशा शब्दांत मोदी यांनी टीका केली.

मराठवाड्यात ११ सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांचे हीत हे आमचे प्राधान्य आहे. नांदेडमध्ये ५ लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपये दिले आहेत. समृद्धी महामार्गामुळे विकासाला नवी चालना मिळाली आहे. नांदेड ते दिली विमानसेवा सुरू झाली आहे. अमृतसर यात्रा विमानसेवा सुरू होणार आहे. ३ करोड महिलांना लखपती दीदी बनवत आहोत. गावातली माझी दीदी लखपती बनेल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, की अकोला कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. कापूस टेक्सटाईल इंडस्ट्रीचा मोठा आधार आहे; पण कापूस उत्पादक शेतकऱ्याला अनेक दशके या शेतीचा लाभ मिळाला नाही. ही परिस्थिती बदलत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी उद्योग आणि पायाभूत सुविधा या दोन्हींना प्रोत्साहन दिले जात आहे.

“महाराष्ट्रात इतकी वर्ष काँग्रेसचे सरकार होते. विदर्भात पाणी संकट वाढत गेले. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सरकारने काय केले? ते दुर्लक्ष करुन स्वत:चे खिसे भरत राहिले. जे सिंचन प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले, त्यांना आघाडीच सरकार आल्यानंतर त्यांनी ब्रेक लावला, असा आरोप मोदी यांनी केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ रविवारी मनमाड शहरात भव्य प्रचार रॅली….

Next Post

ज्यांना मतदान केले, त्यांना नाकारा, राज यांचा सल्ला; माणसांची किंमत नसलेल्यांना का निवडून देता?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
Untitled 13

ज्यांना मतदान केले, त्यांना नाकारा, राज यांचा सल्ला; माणसांची किंमत नसलेल्यांना का निवडून देता?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011