शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली १०० लाख कोटींच्या या योजनेची घोषणा

ऑगस्ट 15, 2021 | 3:12 pm
in मुख्य बातमी
0
pm

नवी दिल्ली – भारत येणाऱ्या काही काळातच कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न साकार करणारी एक मोठी योजना, गतीशक्तीचा राष्ट्रीय मास्टरप्लान, प्रधानमंत्री गतीशक्ती योजना आणणार आहे. तो लागू करणार आहे. शंभर लाख कोटी, शंभर लाख कोटी पेक्षाही अधिकची ही योजना लाखो नवतरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेले भाषणात केली. यावेळी ते म्हणाले की, गतीशक्ती, आपल्या देशासाठी असा राष्ट्रीय पायाभूत सुविधा मास्टरप्लान असेल, जो सर्वंकष पायाभूत सुविधेची पायाभरणी करेल. आपल्या अर्थव्यवस्थेला एकात्मिक आणि सर्वंकष मार्ग प्रदान करेल. आपल्या वाहतुकीच्या साधनांमधे सध्या काही ताळमेळ नसल्याचं आपण बघतो. गतीशक्ती यातले अडथळे दूर करेल, यामधे असलेल्या अडचणींना मार्गातून बाजुला काढेल. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, प्रवासाचा वेळ कमी होईल, औद्योगिक उत्पादन क्षमता आणखी वाढेल. आपल्या स्थानिक उत्पादन निर्मात्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठीही गतीशक्ती खूप मदत करेल. यामुळे भविष्यातील विशेष आर्थिक क्षेत्रांच्या निर्माणाच्या नव्या संधीही विकसित होतील. अमृत काळातील या दशकात गतीची शक्ती भारताच्या कायाकल्पाचा आधार बनेल.

यावेळी पंतप्रधान पुढे म्हणाले की, विकासपथावर अग्रेसर होत आपलं उत्पादन आणि निर्यात दोन्ही वाढवायला हवं. आपण पाहिलं आहे, आता काही दिवसापूर्वीच भारताने आपलं पहिलं स्वदेशी विमानवाहू युद्धजहाज आयएनएस विक्रांत चाचणीसाठी समुद्रात उतरवलं आहे. भारत आज आपलं लढाऊ विमान बनवत आहे. आपली पाणबुडी बनवत आहे. गगनयानही अवकाशात भारताची पताका फडकवण्यासाठी सज्ज होत आहे. स्वदेशी उत्पादनातील आपल्या सामर्थ्याला हे सिद्ध करत आहे. कोरोना नंतर निर्माण झालेल्या नव्या आर्थिक स्थितीत मेक इन इंडियाला स्थापित करण्यासाठी, देशाने उत्पादन संबंधित प्रोत्साहनाचीही घोषणा केली आहे. यामुळे होत असलेल्या परिवर्तनाचं उदाहरण आपण इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन निर्माण क्षेत्रात पाहू शकता. सात वर्षांपूर्वी आपण जवळपास आठ बिलीयन डॉलर्सचे मोबाईल फोन आयात करत होतो. आता याची आयात खूपच घटली असून आपण आज तीन बिलीयन डॉलर्सचे मोबाईल फोन निर्यातही करत आहोत. आपल्या उत्पादन निर्माण क्षेत्राला आज जेव्हा गती मिळतेय आपल्याला कटाक्षानं लक्ष द्यायचं आहे की आपण भारतात जे बनवू, सर्वोच्च दर्जासह, जागितक स्पर्धेत ते टिकायला हवं. शक्य झालं तर एक पाऊल पुढे जायला हवं, ही तयारी करायची आहे. जागतिक बाजारपेठेला आपल्याला लक्ष्य करायचं आहे. देशातल्या सगळ्या उत्पादन निर्मात्यांना मला आग्रहानं सांगायचंय, आपल्या उत्पादन निर्मात्यांनी हे कधी विसरता कामा नये की आपण जे उत्पादन बाहेर विकता, ते केवळ तुमच्या कंपनीने तयार केलेलं एक यंत्र नाही, केवळ एक उत्पादन नाही. त्याच्या सोबत भारताची ओळख जोडलेली असते. भारताची प्रतिष्ठा जोडलेली असते. भारताच्या कोटी कोटी लोकांचा विश्वास जोडलेला असतो. यामुळेच मी प्रत्येक उत्पादन निर्मात्यांना सांगत असतो तुमचं प्रत्येक उत्पादन भारताचं ब्रँड अँबेसेडर आहे. जोपर्यंत त्या उत्पादनाचा वापर होत राहिल, वापरकर्ता छाती पुढे काढून, अभिमानानं म्हणेल, होय, हे मेड इन इंडिया आहे. हा दृष्टिकोण, मनोवस्था हवी. आता तुमच्या मनात जगभरातील बाजारपेठेवर गारुड करण्याचं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार तुमच्यापाठी सर्वोतोपरी उभं आहे. देशातील आज वेगवेगळया क्षेत्रात, छोट्या छोट्या शहरातही, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या शहरातही नवेनवे स्टार्ट अप्स बनत आहेत. त्यांचं भारतीय उत्पादन जागतिक बाजारपेठेत जाण्यासाठी मोठी भूमिकाही वठवत आहे. सरकार, आपल्या या स्टार्ट अप्सच्या पाठी पूर्ण ताकदीनं उभं आहे. त्यांना आर्थिक मदत करणं असो, करात सवलत देणं असो, त्यांच्यासाठी नियम सुलभ करणं असो, सर्व काही केलं जात आहे. आपण पाहिलं आहे, कोरोनाच्या या कठिण काळात हजारो, हजारो नवे स्टार्ट अप्स पुढे आले आहेत. यशस्वीपणे ते पुढे वाटचाल करत आहेत. कालचे स्टार्ट अप्स आजचे मोठे युनिकॉर्न उद्योग बनत आहेत. यांचं बाजारमूल्य हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहचत आहे.

हे देशातील नवे इच्छा आणि संकल्पना निर्माते आहेत. आपल्या अभिनव कल्पनांच्या सहाय्याने ते स्वतःच्या पायावर उभे राहात आहेत. अग्रेसर होत आहेत. जगावर अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या दशकात भारताचे स्टार्ट अप्स, भारताची स्टार्ट अप्स व्यवस्था याला आपण जगात सर्वश्रेष्ठ बनवण्याच्या दिशेनं आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला थांबायचं नाही. लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी देशातील प्रत्येक व्यवस्थेला एकत्रित काम करावे लागेल. मी हे आवाहन करत आहे आणि अतिशय आग्रहाने करत आहे की केंद्र असो वा राज्य, सर्वांच्या विभागांना मी सांगत आहे, सर्व सरकारी कार्यालयांना सांगत आहे, आपल्या येथे नियमांच्या, प्रक्रियांच्या आढाव्याची मोहीम राबवत जा. असा प्रत्येक नियम, अशी प्रत्येक प्रक्रिया जी देशाच्या जनतेसाठी अडथळा निर्माण करत असेल तर तो नियम किंवा प्रक्रिया आपल्याला काढून टाकलीच पाहिजे. जे सत्तर पंचाहत्तर वर्षात जमा झाले आहे ते एका दिवसात किंवा एका वर्षात दूर होणार नाही याची मला कल्पना आहे. पण आपण जर मनाशी निर्धार करून काम सुरू केले तर आपल्याला ते नक्कीच करता येईल असेही पंतप्रधानांनी सांगितले.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेले संपूर्ण भाषण

Next Post

‘त्या’ अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला सज्जड दम

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
ashwini vaishnav1

'त्या' अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला सज्जड दम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011