पिंपळगाव बसवंत: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील उंबरखेड चौफुली, चिंचखेड चौफुलीसह वणी चौफुली परिसरातील सर्व्हिसरोडला पावसाने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन धारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत असल्याने महामार्ग प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, सर्व्हिसरोडची दुरुस्ती तातडीने न केल्यास टोलनाका बंद पाडून जन आंदोलन उभारण्याचा इशारा पिंपळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विद्यार्थी सेनेच्या वतीने महामार्ग प्राधिकरणचे संदेश कुशारे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हंटल्याप्रमाणे पिंपळगाव बसवंत शहरात उड्डाणपुल झाल्यामुळे वाहतूक कोंडी थांबली. असली तरी महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे राष्ट्रीय महामार्गावरील
सर्विसरोडची पावसाने पुरती चाळण झाली आहे. उंबरखेड चौफुली ते वणी चौफुली परिसरातील सर्व्हिसरोडला मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन खड्ड्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ झाल्याने महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने शहरातील दोन्ही बाजूच्या सर्व्हिसरोडची तातडीने दुरुस्ती करावी.रस्ता तातडीने दुरुस्ती न केल्यास टोलनाका बंद पाडून जण आंदोलनाचा इशारा देखील मनसेसह मनवीसेनेने निवेदनातून दिला आहे. निवेदनप्रसंगी मनसे जिल्हा संघटक संजय मोरे, मनसे विद्यार्थी सेना निफाड विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष नितिश झुटे, मनसे विद्यार्थी सेना कार्याध्यक्ष सुमित जाधव, उपशहराध्यक्ष पियुष पाटील, समाधान फाळके,मनसे विद्यार्थी सेना संघटक सागर कटाळे, अनिल आहेर,महेश कोपरे,फरान सैय्यद आदी उपस्थित होते.