नाशिक (इंडिय दर्पण वृत्तसेवा)- कर्मयोगीनगर, गोविंदनगरसह प्रभाग २४ एक वर्षापासून पाणी टंचाईला सामोरा जात आहे. नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने महापालिकेने पाणीपट्टीत पन्नास टक्के सवलत द्यावी, पुरवठा सुरळीत होईपर्यंत जास्त वेळ किंवा टँकरने पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांसह पाणी पुरवठा विभागाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने गुरुवारी निवेदन दिले असून, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कर्मयोगीनगर, तिडकेनगर, गोविंदनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद््गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर, खांडे मळा येथे सतत कमी दाबाचा, कमी वेळेचा आणि अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्रस्त नागरिकांना एक वर्षापासून पाणी विकत घ्यावे लागत आहे, उन्हाळ्यात हा खर्च वाढला आहे. त्यामुळे रहिवाशांना पाणीपट्टीत पन्नास टक्के सवलत द्यावी, ज्यांनी पाणीपट्टी भरली आहे त्यांची पन्नास टक्के सवलतीची रक्कम पुढील वर्षीच्या करात वर्ग करावी, पुरवठा सुरळीत होईपर्यंत टँकरने पाणी द्यावे, पुरवठ्याची वेळ दोन तासांनी वाढवावी, दोनवेळ पाणी पुरवठा करावा, या मागण्या करण्यात आल्या आहेत. पाणीटंचाई कायम राहिली तर पुढील वर्षीची पाणीपट्टी भरण्यावर बहिष्कार टाकण्याबाबत नागरिक विचार करतील, हे महापालिकेने गांभीर्याने घ्यावे.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना गुरुवारी, २७ मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, वंदना पाटील, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, संजय टकले, यशवंत जाधव, आनंदा तिडके, डॉ. सिताराम कोल्हे, नवलनाथ तांबे, संदीप गहिवाड, शिवाजी मेणे, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, संदीप कासार, पंढरीनाथ पाटील, दिलीप रौंदळ, सतीश मणिआर, अशोक पाटील, संदीप महाजन, दीपक दुट्टे, किरण काळे, सचिन राणे, हरिष काळे यांच्यासह रहिवाशांनी दिला आहे.