नवी दिल्ली – तळागाळात अपवादात्मक परिस्थितीत काम करणारे परंतु, अद्याप प्रकाशझोतात न आलेल्या लोकांचे नामांकन जनतेच्या पद्म पुरस्कारांसाठी केले जावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. १५ सप्टेंबर पर्यंत ही नामांकने करता येऊ शकतील.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “भारतात खूप प्रतिभावान लोक आहेत, जे तळागाळात अतिशय वेगळ्या पठडीतील काम करीत आहेत. अनेकदा, आपण त्यांच्याबद्दल काही ऐकलेले नसते अथवा पाहिलेले नसते. आपल्याला अशा प्रेरणादायी व्यक्ती माहीत आहेत का ? आपण त्यांची नावे #PeoplesPadma साठी नामांकित करू शकता. नामनिर्देशने १५ सप्टेंबर पर्यंत सुरू राहतील.“
https://twitter.com/narendramodi/status/1414085499971465216