शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गडकरी यांची काँग्रेसवर टीका; संविधान बदलण्याचे पाप त्यांचेच

by India Darpan
नोव्हेंबर 13, 2024 | 1:23 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
WhatsApp Image 2024 11 10 at 21.13.19 2

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणालाही बदलता येणार नाही अथवा आम्ही बदलू देणार नाही, असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकर यांनी व्यक्त केला. काँग्रेसनेच अनेक वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न केला, म्हणून काँग्रेसचा प्रचार म्हणजे उलट्या बोंबा याप्रमाणे आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही केलेल्या विकासाचा प्रतिवाद करता येत नाही, म्हणून काँग्रेसने जनतेत संभ्रम निर्माण केला, अशी टीका केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, डॉ. सुनील गायकवाड, आमदार शरणू सलगर, माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रकाश खंड्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सूरज चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, अरविंद पाटील निलंगेकर आदी या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, की काँग्रेस पक्षानेच भारतीय संविधानाचा बोजवारा उडवला असून अनेक वेळा घटना बदलण्याचे काम त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पीठाने घटनेच्या मूलतत्त्वाला कोणीही हात लावू शकत नाही असा निर्णय दिला आहे. त्यामुळे घटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पुनरुचार त्यांनी या वेळी केला. शिवाय काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे साठ वर्षात काँग्रेस देशाचा विकास करू शकली नाही. हे जनतेसमोर असून आम्ही काय दहा वर्षात विकास केला हे पण जनतेसमोर आहे. त्यामुळेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भारत हा जगातील तिसरी शक्तिशाली आर्थिक देश बनणार असून, येत्या काळात मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा आमचा नारा असून संपूर्ण भारतभर रस्त्याची जाळे पसरले आहे. येत्या काळात उर्वरित रस्त्याचे कामे केली जाणार आहेत. देशातला शेतकरी अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता, इंधन दाता झाला पाहिजे हे धोरण भारतीय जनता पक्षाचे आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राणा दांपत्यावर अजितदादांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचीही समज

Next Post

रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला मारली लाथ!

Next Post
Untitled 30

रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला मारली लाथ!

ताज्या बातम्या

jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011