इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेची निलेश राणे यांनी खिल्ली उडवली. ते तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे २० आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी खिल्ली उडवली.
हिंदूत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचा निलेश राणे यांनी ठाकरेंना टोला लगावला. निलेश राणे धाराशिव दौ-यावर होते. त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी डिनो मोरिया प्रकरणात आदित्य ठाकरे यांना जेलची वारी होऊ शकते असा दावा केला. त्यामुळे राजकीय वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे.