इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना मंत्री नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. जिल्हा नियोजन समितीच्या कामांवर स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर थेट इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की, सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय. कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत.
त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, नितेशने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलतांना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण, आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.
नितेश राणे ब-याच वेळा भडक वक्तव्य करतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील घटक पक्षाची कधी कधी अडचण होते. त्यामुळे त्यांच्या बंधुंनी आता त्यांचे कान टोचले आहे.