मुंबई – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ सध्या ओमानकडे गेले असले तरी राज्यात आगामी काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आगामी ४-५ दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. ज्यावेळी विजा चमकत असतील त्यावेळी कृपया बाहेरचे काम टाळा. त्यावेळी घराबाहेर पडू नका. त्यात जीवाला धोका असू शकतो. शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपारनंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते, असे हावामन विभागाने स्पष्ट केले आहे. आजपासून आगामी तीन दिवसांचे हवामान आणि पावसाचा इशारा खालीप्रमाणे