शुक्रवार, नोव्हेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नव्या केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा भाजपला किती फायदा झाला?

सप्टेंबर 3, 2021 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
E93tkDnVQAMtrB8

नवी दिल्ली – एकीकडे देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी-जास्त होत असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्याने समाविष्ट झालेल्या भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेचा भाजपला किती फायदा झाला ? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असून भाजप कडून देखील या यात्रेबद्दल आढावा घेतला जात आहे.

नवीन केंद्रीय मंत्र्यांनी नुकत्याच विविध प्रांतात काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेचा आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी भाजपला किती फायदा होऊ शकतो, याचा आढावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येत आहे. विशेषत: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत, यासाठी ही चाचपणी खूप महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे भाजपने अलीकडेच उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री बदलून निवडणूक तयारीला नवे रूप दिले आहे. इतकेच नव्हे तर केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीपासून लखनौपर्यंत अनेक बैठका घेऊन उत्तर प्रदेशचा व्यापक आढावा घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात नुकतेच नव्याने समाविष्ट झालेले, तसेच बढती मिळालेले भाजपचे ३९ मंत्री यांनी गेल्या महिन्यात दि. १६ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. काही ठिकाणी ती दोन आठवडे चालली. या दरम्यान या मंत्री गणांनी २१२ लोकसभा मतदारसंघांना भेट दिल्या, आणि १९ राज्यातील जनतेचे आशीर्वाद घेत संवाद साधला. तसेच या यात्रेमध्ये सर्व मंत्री यांनी काही दिवस स्वतंत्रपणे प्रवास करत सरकारचा विचार आणि कार्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला.

यात्रा काळात सरकारच्या या उपक्रमाविषयी विरोध देखील झाला, कारण सध्या कोरोनाचा धोका कायम असून याचा संसर्ग वाढू शकतो, अशी टीका विरोधकांनी सातत्याने केली होती. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात या यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने वादंग निर्माण झाले होते त्यानंतर राणे यांना अटक झाली होती, त्यामुळे राणे यांच्या बरोबरच भाजपची देखील प्रतिमा मलिन झाली, असे म्हटले जाते. तर दुसरीकडे आसाम मध्ये देखील या यात्रेमुळे वाद निर्माण करण्यात आला होता.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे चारमध्ये भाजपची सरकारे आहेत, तर पंजाब काँग्रेसचे सरकार आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभीच या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे भाजपचे नेतृत्व विविध पातळ्यांवर तयारी करत आहे, पण त्याचा प्रयत्न गाव पातळीवर जाऊन पक्ष आणि सरकारबाबत लोकांचे मन जाणून घेण्याचा आहे. त्याचबरोबर सरकारने केलेल्या जनहिताच्या गोष्टी गरीब लोकांपर्यंत पोहचल्या का नाहीत ? त्या कशा पोहचवाव्या लागतात. याची या मंत्र्यांना व्हावी, म्हणून भाजप नेतृत्वांने यात्रा तथा दौऱ्यांचे नियोजन केले होते.

आता सदर यात्रा संपल्यानंतर या संदर्भात व्यापक अभिप्राय घेतला जात आहे. तसेच जिल्हा आणि राज्य संघटनांकडूनही माहिती घेतली जात आहे. कामगारांचा सहभाग, सरकार आणि पक्षाबद्दल लोकांची प्रतिक्रिया, केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यावरील लोकांच्या प्रतिक्रिया यांचा समावेश आहे. म्हणूनच जन आशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमाबाबत लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या मानल्या जात आहे. तसेच सोशल मीडियावरील त्यांच्या चर्चेचाही अभ्यास केला जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हो, लसीकरणापूर्वीच देशात सुरू होणार शाळा

Next Post

लस घेताच ‘ते’ चक्कर येऊन कोसळले; मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
vaccine

लस घेताच 'ते' चक्कर येऊन कोसळले; मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011