नवी दिल्ली – कोरोना विषाणूची दुसऱ्या लाटेने देशभरात गोंधळाचे वातावरण आहे. दुसऱ्या लाटेतील स्ट्रेन गेल्या लाटेपेक्षा धोकादायक असून, सर्व वयोगटातील लोकांवर हा सारखाच परिणामकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर हा विषाणू निदर्शनास येत नसल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये लक्षणे असतानाही त्यांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. भारतात आढळत असलेल्या कोरोना विषाणूच्या या स्ट्रेनची चुकीचे किंवा खोटे अहवाल येण्याची शक्यता नाही. देशभरात रुग्णांची तीव्र लक्षणे असताना त्यांचे नकारात्मक अहवाल येत आहेत.
आरटीपीसीआर चाचण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या किटद्वारे दोनहून अधिक नमुन्यांची चाचणी करता येते. त्यामुळे नमुन्यांकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता कमी होते, असे सरकारचे म्हणणे आहे. भारतात आरटीपीसीआर किटचा दोनहून अधिकवेळा उपयोग होत असल्याने आरटीपीसीआर परीक्षण या म्युटेशनला ओळखू शकत नाही.
