रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजपासून विशेष लेखमाला… भारत : एक दर्शन (भाग १)… चला, भारत समजून घेऊया…

by India Darpan
ऑगस्ट 11, 2023 | 5:03 am
in इतर
0
bharatmata

आजपासून विशेष लेखमाला
भारत : एक दर्शन – १
चला, भारत समजून घेऊया

“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असे म्हटले जाते. तेव्हा स्वर्गापेक्षाही जिची महानता अधिक आहे अशी आपली मातृभूमी म्हणजे ‘भारत’. भारत या शब्दामध्ये भा आणि रत ही दोन पदं आहेत. भारत या शब्दाची संस्कृतातील व्युत्त्पत्ती ‘भा नाम अभा, अभा नाम प्रभा, प्रभा नाम ज्ञानम्, तत्र रतः’ अशी आहे; म्हणजेच ज्ञानामध्ये रममाण झालेल्या लोकांचा देश म्हणजे ‘भारत’, अशी भारताची व्याख्या आहे.

भारताला एक महान परंपरा लाभलेली आहे, ज्ञानवारसा लाभलेला आहे. एकेकाळी सर्व जगाचे लक्ष ज्या भारताकडे वळलेले होते, त्या भारताच्या वैभवसंपन्नतेचे काय वर्णन करावे? भारत एकेकाळी समृद्धीच्या, ज्ञानशोधांच्या, कर्मकौशल्याच्या, कलानिपुणतेच्या गिरीशिखरावर विराजमान होता. सरस्वती आणि लक्ष्मी दोघीजणी येथे गुण्यागोविंदाने नांदत होत्या. भारतामध्ये आजही टिकून असलेली प्राचीन मंदिरे, वास्तुकलेचे नमुने याची साक्ष देतात.

परंतु परधार्जिणेपणाचा, अवमानाचा, यातनांचा एक अचेतन कालखंडही या भारताने सोसला. सारी समृद्धता, ज्ञानवैभव, कलाकौशल्य नामशेष होत गेले. भारतभूमीला दास्यत्व पत्करावे लागले. भारत आणि भारतीयांच्या प्रत्येक गोष्टीकडेच नकारार्थी दृष्टीने पाहणाऱ्या काही विद्वज्जनांच्या विखारी प्रचारामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये खोलवर न्यूनगंड निर्माण झाला. तो वाढतच राहिला आणि भारत खचत खचत गेला.

पुढे अनेकानेकांच्या प्रयत्नांमुळे, बलिदानामुळे, व्यूहरचनेमुळे, मुत्सद्दीपणामुळे भारताला यथावकाश स्वातंत्र्य मिळाले. पण दुर्दैवाची बाब अशी की, ते होते विभाजित स्वातंत्र्य. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये भारताने काय कमावले आणि काय गमावले याचा लेखाजोखा आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. कारण त्यातील काही गोष्टींचे आपण साक्षी आहोत.

arvind

आज जग पुन्हा एकदा भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. एकेकाळी भारताच्या केवळ भौतिक समृद्धतेला भुललेले जग, आता काहीसे अधिक सुजाण झाले आहे. सोनेनाणे, पैसाअडका, जडजवाहीर, किमती मसाले, धनधान्य इत्यादी भौतिक संपत्तीपेक्षा, अधिक मौल्यवान संपत्ती भारताकडे आहे, याची जाणीव आता जगाला झाली आहे. अर्थसंपदेच्या बाबतीत भारताचा जगामध्ये कितवा का क्रमांक असेना, पण योगमार्ग, दर्शनं, पराविद्या, अध्यात्म, तत्त्वज्ञान, यांची भांडारं आणि मुख्यतः आंतरिक शांतीचे झरे भारतात जागोजागी आहेत, त्याचा शोध घ्यायला हवा, याची जाण आता जगाला झाली आहे. आणि म्हणूनच भारताकडे जिज्ञासेने येऊ पाहणाऱ्या परदेशी व्यक्तींची संख्या आज वाढत आहे.

अशा वेळी, एक भारतीय नागरिक म्हणून आपण स्वतःतरी या बाबतीत कितपत सुजाण आहोत, हे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला भारताच्या समृद्ध वारशाची खरंच ओळख आहे का? की, केवळ इतिहासाच्या गौरवशाली वारशाचा अभिमान बाळगण्यामध्येच आपण कृतकृत्यता मानतो? आपण केवळ पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने, भारताला नावेच ठेवत असतो? एकीकडे नुसतेच स्तुतिपाठक आणि दुसरीकडे निंदानालस्ती करणारे आपल्याच अस्तनीतले निखारे, हे दोघेही भारताचे सारखेच नुकसान करत नसतात का? तेव्हा आता गरज आहे, या दोन्ही टोकांच्या विचारसरणीचा त्याग करून, भारताची खरी महानता कशामध्ये दडलेली आहे, याचा शोध घेण्याची!

देशप्रेमाचे स्फुल्लिंग
भारत पारतंत्र्यामध्ये असताना, देशबांधवाच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग पेटविण्यासाठी ‘कर्मयोगिन्’ साप्ताहिकाच्या माध्यमातून श्रीअरविंद यांनी भारतीय संस्कृतीचे, तिच्या समृद्ध वारशाचे जे संस्मरण केले होते, त्याचाच मागोवा आपण उद्यापासून ‘भारत – एक दर्शन’, या मालिकेच्या माध्यमातून घेणार आहोत. भारत हा नेहमीच श्रीअरविंदांच्या चिंतनाचा विषय राहिलेला होता. त्यांनी भारताविषयी विपुल लेखन केले आहे, त्यातील निवडक भागाचा समावेश या मालिकेमध्ये असणार आहे. सद्यकालीन भारत पुन्हा एकदा त्याच गिरीशिखरावर विराजमान होण्यासाठी एक नागरिक म्हणून आपल्याला नेमके काय करता येणे शक्य आहे, याची दिशा तुम्हाआम्हाला, आपल्या सर्वांना लाभावी, या भूमिकेतून भारताचे ‘दर्शन’ घेण्याचा हा एक प्रयत्न.

डॉ. केतकी मोडक
(संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक)

New Article Series Bharat Ek Darshan Shri Arvind

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

श्री विष्णु पुराण… पहिल्या सात मन्वंतरांतील मनू, इंद्र, देव, सप्तर्षी व मनूपुत्रांचे वर्णन…

Next Post
bhagwan vishnu

श्री विष्णु पुराण... पहिल्या सात मन्वंतरांतील मनू, इंद्र, देव, सप्तर्षी व मनूपुत्रांचे वर्णन...

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011