शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कांदे-भुजबळ वादावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की…..

by India Darpan
ऑक्टोबर 1, 2021 | 4:30 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20211001 WA0013

येवला – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात सध्या मोठा वाद सुरू आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अधिकृत प्रतिक्रीया दिली आहे. महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उत्तम काम करीत आहे. काही गैरसमज असतील तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्यात येईल. त्यांच्यासमोर हा वाद मिटेल, अशी खात्री आहे. जरी वाद मिटला नाही तरी नाशिकचे पालकमंत्री पद हे भुजबळ यांच्याकडेच असेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रे दरम्यान ते आज येवला येथे आले. तेथे त्यांनी विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

जे देश सोडून पळाले त्यांच्यावर ईडी व तपास यंत्रणांनी विश्वास ठेवावा का

भुजबळसाहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजपसरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीरसिंग देश सोडून पळून गेले आहेत त्यांच्या आरोपावर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा असा सवाल पाटील यांनी केला आहे.

लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होते आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळसाहेबांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

भुजबळसाहेबांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे.आपले फक्त ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे असे जयंत पाटील यांनी सांगितले. भुजबळसाहेब अफाट काम करत आहे. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. हे कधी शक्य होईल जेव्हा आपले संघटन मजबूत असेल असेही जयंत पाटील म्हणाले.

बुथ कमिट्यांचे काम सक्षमपणे करा त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करू. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळसाहेबांच्या पाठपुराव्याने. भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही असेही गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले. यावेळी आलेल्या अभिप्रायचे वाचन जयंत पाटील यांनी केले.संवाद परिवार संवाद यात्रा नवव्या दिवशी नाशिक जिल्हयात दाखल झाली आहे.

येवला – लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा
यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खवटे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, सामाजिक न्यायविभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत सिरसाट, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकबर शहा, येवला संपर्क प्रमुख बाळासाहेब लोखंडे, महिला तालुकाध्यक्षा सोनाली कोथमे, युवक तालुकाध्यक्ष मोहन शेलार आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

WhatsApp ची ही एक गंमत तुम्हाला माहीत आहे का?

Next Post

नाशिक शहरात तीन ठिकाणी महिलांचा विनयभंग

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक शहरात तीन ठिकाणी महिलांचा विनयभंग

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
Screenshot 20250508 204411 Facebook 1

नाशिक महानगरपालिका पाणीवापराचे थेट स्पॉट बिलिंग देणार…या एजन्सीची नियुक्ती

मे 8, 2025
IMG 20250508 WA0346 3

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार…

मे 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011