मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आज अटक केली आहे. हर हर महादेव या चित्रपटाला आव्हाड यांनी विरोध केला. तसेच, ठाण्यातील मॉलमध्ये यासंदर्भात जोरदार विरोध प्रदर्शन झाले. याचदरम्यान, एका प्रेक्षकाला मारहाण झाली. त्यानंतर प्रेक्षकाने पोलिसांकडे तक्रार केली. आता या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1591002999320883200?s=20&t=FntxJcotOeDG7k0LmI2i3A
अटक झाल्यानंतर आव्हाड यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.
मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1591003030836871170?s=20&t=FntxJcotOeDG7k0LmI2i3A
NCP Leader Jitendra Awhad Arrested by Police