बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बापरे ! नैसर्गिक आपत्तीमध्ये गेल्या ३ वर्षात एवढ्या जणांचा गेला जीव…

सप्टेंबर 14, 2021 | 12:55 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
अपघात किंवा आजारांमुळे अनेक लोकांचे जीव जातात. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे देखील भारतात अनेक लोकांचा मृत्यू होतो ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणता येईल, विशेषत : चक्रीवादळ, महापूर, मुसळधार पाऊस, वीजा कोसळणे, प्रचंड तापमान आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे देखील अनेक लोकांचे जीव जातात. देशात गेल्या ३ वर्षात अतिवृष्टी, वीज, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या जल-हवामान आपत्तींमध्ये ६,८११ लोक मरण पावले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

विशेषत: बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश केरळमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो लोकांनी आपला जीव गमावला. त्याचवेळी, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार सारख्या काही राज्यांचा किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबतचा डेटा काही वर्षांपासून गहाळ होता. एप्रिल २०१८ ते मार्च २०२१ पर्यंत गेल्या ३ वर्षात मृत्यूच्या यादीत बंगाल अव्वल असून येथे अशा आपत्तींमध्ये किमान ९६४ लोक मरण पावले. त्यामुळे देशात सात मृत्यूंपैकी एक मृत्यू बंगालमध्ये झाला. बंगालनंतर मृतांच्या संख्येत मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ९१७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ७०८ मृत्यूंसह केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मध्य प्रदेशात २०१९ ते २०२० मध्ये ६७४ मृत्यूंची नोंद झाली असून मुख्यतः पुरामुळे ही दुर्घटना घडली आहे. झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि बिहार सारख्या काही राज्यांचा डेटा काही वर्षांपासून गहाळ होता. जल-हवामान आपत्तींमध्ये मुसळधार पाऊस, वीज, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, हिमस्खलन, उष्णतेची लाट आणि थंडीची लाट यांचा समावेश आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे उपलब्ध आकडेवारी नुसार , भारतीय किनाऱ्यावर २०२० मध्ये पाच गंभीर चक्रीवादळे देशामध्ये धडकली. त्याचप्रमाणे पूर आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे, असे या आकडेवारीवरून दिसून येते. भारतभरात २०२० मध्ये १,९१२ स्थानकांवर अतिवृष्टीची नोंद झाली आणि ३४१ स्थळांवर अतिवृष्टीची नोंद झाली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विजय रुपाणींच्या कन्येने केलेली फेस बुक पोस्ट चांगलीच चर्चेत

Next Post

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला हा मोठा खुलासा…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
saurav ganguli

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला हा मोठा खुलासा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011