रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक! देशाच्या ग्रामीण भागातील तलावांची ही आहे दयनीय अवस्था; अहवालाचा निष्कर्ष

जुलै 25, 2021 | 6:12 am
in राष्ट्रीय
0
तलाव

नवी दिल्ली – देशाच्या काही भागात अतिवृष्टीचा कहर सुरू असला तरी अनेक भाग मात्र पाणी टंचाईला तोंड देत आहे. त्यातच पाणी साठवणुकीसाठी जे निसर्गनिर्मित किंवा कृत्रिम तलाव आहेत त्यांची अवस्था मात्र अतिशय दयनीय असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील ५३ हजारांहून अधिक तलाव आणि जलाशय सिंचनासाठी अजिबात उपयुक्त नाहीत. देशव्यापी पाचव्या गणनेतून ही बाब समोर आली आहे.

देशात बहुतांश ठिकाणी तलाव, विहिरी, पाणवठ्यातील पाणी सिंचनासाठी वापरले जाते. परंतु अस्वच्छता, देखरेखीअभावामुळे काही जलाशये नामशेष झाली आहेत. देशात किती तलाव आणि जलाशये आहेत, ते किती उपयुक्त आहेत याबाबत केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने तलावांची गणना केली. या गणनेत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

देशातील ५३ हजारांहून अधिक तलाव आणि जलाशय सिंचनासाठी अजिबात उपयुक्त नाहीत, ही बाब पाचव्या गणनेत निदर्शनास आली आहे. मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ, पाण्याचा अभाव आणि खार्या पाण्यामुळे या जलाशयांचा उपयोग सिंचनासाठी केला जाऊ शकत नाही. अनेक राज्यांमध्ये ग्रामसमाजाच्या जमिनींवर असलेल्या तलावांवर अतिक्रमण झाल्याने त्यांचा वापर करता येत नाही. तलाव अतिक्रमणमुक्त करावे असे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. तलावांच्या पुनर्निमितीसाठी केंद्राकडून दोन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

देशात पारंपरिक जुने तलाव आणि जलाशयांचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. परंतु देखरेख ठेवण्याच्या अभावामुळे या तलावांची परिस्थिती चागंली नाही. केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने देशातील जलाशयांची गणना केली. देशात एकूण ५,१६,३०३ तलाव आणि जलाशये आहेत. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही आकडेवारी देण्यात आली. या जलाशयांपैकी ५३ हजारांहून अधिक जलाशयांची स्थिती खूपच खराब आहे. बहुतांश जलाशयांची स्वच्छता न झाल्याने त्यामध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे काही तलावात पाणीच नाही, किंवा काहींमध्ये खूपच कमी पाणी आहे. ते पाणी सिंचनासाठी उपयुक्त नाही.

केंद्राकडून आर्थिक मदत
राज्य सरकारकडून तलावांचे पुनर्भरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राकडून या कामाकरता अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण भागातील तलाव आणि जलाशयांच्या पुनर्भरणासाठी रिपेयर, रिनोव्हेशन आणि रेस्टोरेशन (आरआरआर) योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना या नावाने प्रत्येक शेताला पाणी देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या तलावांतून सिंचनासाठीचे पाणी वाढविले जात आहे. जलसंधारण मंत्रालयाच्या अतिरिक्त ग्रामीण विकास मंत्रालयाकडून विशेष योजना सुरू करत आहे. मनरेगामार्फतही जुन्या तलावांची स्वच्छता आणि त्याच्याभोवती तटबंदी बांधण्यात येत आहे.

अतिक्रमण हटविण्याला प्रधान्य
उन्हाळ्याच्या दिवसात तलावातील पाणी आटल्यानंतर त्यातून गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. तलावात पाणी भरण्याचे नालेसुद्धा स्वच्छ केले जातात. मनरेगामार्फत जलसंरक्षणाच्या दिशेने सर्वाधिक कामे सुरू आहेत. विविध राज्यांच्या २२२८ तलावांची स्वच्छता आणि तटबंदी बांधण्यासाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. तलावांवर झालेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश संबंधित राज्यांना देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात तलावांवर झालेले अतिक्रमण हटविण्यास प्राधान्य दिले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हृदयद्रावक! किन्नर बाळ जन्माला आले म्हणून आई-वडिलांनी मंदिराबाहेर सोडून दिले

Next Post

आरोग्य टीप्स : दोरीवरील उड्या मारण्याचा व्यायाम चांगला; हे आहेत फायदे

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
E62MBw VgAEmJ8l

आरोग्य टीप्स : दोरीवरील उड्या मारण्याचा व्यायाम चांगला; हे आहेत फायदे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011