गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक! देशाच्या ग्रामीण भागातील तलावांची ही आहे दयनीय अवस्था; अहवालाचा निष्कर्ष

by Gautam Sancheti
जुलै 25, 2021 | 6:12 am
in राष्ट्रीय
0
तलाव

नवी दिल्ली – देशाच्या काही भागात अतिवृष्टीचा कहर सुरू असला तरी अनेक भाग मात्र पाणी टंचाईला तोंड देत आहे. त्यातच पाणी साठवणुकीसाठी जे निसर्गनिर्मित किंवा कृत्रिम तलाव आहेत त्यांची अवस्था मात्र अतिशय दयनीय असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील ५३ हजारांहून अधिक तलाव आणि जलाशय सिंचनासाठी अजिबात उपयुक्त नाहीत. देशव्यापी पाचव्या गणनेतून ही बाब समोर आली आहे.

देशात बहुतांश ठिकाणी तलाव, विहिरी, पाणवठ्यातील पाणी सिंचनासाठी वापरले जाते. परंतु अस्वच्छता, देखरेखीअभावामुळे काही जलाशये नामशेष झाली आहेत. देशात किती तलाव आणि जलाशये आहेत, ते किती उपयुक्त आहेत याबाबत केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने तलावांची गणना केली. या गणनेत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

देशातील ५३ हजारांहून अधिक तलाव आणि जलाशय सिंचनासाठी अजिबात उपयुक्त नाहीत, ही बाब पाचव्या गणनेत निदर्शनास आली आहे. मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ, पाण्याचा अभाव आणि खार्या पाण्यामुळे या जलाशयांचा उपयोग सिंचनासाठी केला जाऊ शकत नाही. अनेक राज्यांमध्ये ग्रामसमाजाच्या जमिनींवर असलेल्या तलावांवर अतिक्रमण झाल्याने त्यांचा वापर करता येत नाही. तलाव अतिक्रमणमुक्त करावे असे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. तलावांच्या पुनर्निमितीसाठी केंद्राकडून दोन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

देशात पारंपरिक जुने तलाव आणि जलाशयांचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. परंतु देखरेख ठेवण्याच्या अभावामुळे या तलावांची परिस्थिती चागंली नाही. केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने देशातील जलाशयांची गणना केली. देशात एकूण ५,१६,३०३ तलाव आणि जलाशये आहेत. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही आकडेवारी देण्यात आली. या जलाशयांपैकी ५३ हजारांहून अधिक जलाशयांची स्थिती खूपच खराब आहे. बहुतांश जलाशयांची स्वच्छता न झाल्याने त्यामध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे काही तलावात पाणीच नाही, किंवा काहींमध्ये खूपच कमी पाणी आहे. ते पाणी सिंचनासाठी उपयुक्त नाही.

केंद्राकडून आर्थिक मदत
राज्य सरकारकडून तलावांचे पुनर्भरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राकडून या कामाकरता अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण भागातील तलाव आणि जलाशयांच्या पुनर्भरणासाठी रिपेयर, रिनोव्हेशन आणि रेस्टोरेशन (आरआरआर) योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना या नावाने प्रत्येक शेताला पाणी देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या तलावांतून सिंचनासाठीचे पाणी वाढविले जात आहे. जलसंधारण मंत्रालयाच्या अतिरिक्त ग्रामीण विकास मंत्रालयाकडून विशेष योजना सुरू करत आहे. मनरेगामार्फतही जुन्या तलावांची स्वच्छता आणि त्याच्याभोवती तटबंदी बांधण्यात येत आहे.

अतिक्रमण हटविण्याला प्रधान्य
उन्हाळ्याच्या दिवसात तलावातील पाणी आटल्यानंतर त्यातून गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. तलावात पाणी भरण्याचे नालेसुद्धा स्वच्छ केले जातात. मनरेगामार्फत जलसंरक्षणाच्या दिशेने सर्वाधिक कामे सुरू आहेत. विविध राज्यांच्या २२२८ तलावांची स्वच्छता आणि तटबंदी बांधण्यासाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. तलावांवर झालेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश संबंधित राज्यांना देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात तलावांवर झालेले अतिक्रमण हटविण्यास प्राधान्य दिले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हृदयद्रावक! किन्नर बाळ जन्माला आले म्हणून आई-वडिलांनी मंदिराबाहेर सोडून दिले

Next Post

आरोग्य टीप्स : दोरीवरील उड्या मारण्याचा व्यायाम चांगला; हे आहेत फायदे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, शुक्रवार, १९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
IMG 20250918 WA0380 1
संमिश्र वार्ता

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्यात सुधारणा करा…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 18, 2025
G1IZjsTaQAA9THD 1024x652 1
महत्त्वाच्या बातम्या

सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश….

सप्टेंबर 18, 2025
crime1 1
क्राईम डायरी

रूम पार्टनर झोपी गेला…परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून केला पोबारा

सप्टेंबर 18, 2025
G0yR538bcAA85YQ e1758203148768
राष्ट्रीय

आता या परिक्षेत उमेदवारांच्या चेहेरा प्रमाणीकरणासाठी AI चा वापर…

सप्टेंबर 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
Next Post
E62MBw VgAEmJ8l

आरोग्य टीप्स : दोरीवरील उड्या मारण्याचा व्यायाम चांगला; हे आहेत फायदे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011