मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रवादी, तृणमूल यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का गेला? यात काही राजकारण आहे का? निकष काय आहेत?

एप्रिल 12, 2023 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
FtYQs qXgDAqHBo

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजकीय पक्षांचा राष्ट्रीय दर्जा सध्या देशात चर्चेसाठी ट्रेंडिंग विषय आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्थापन केलेेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्थापन केलेला तृणमूल कॉंग्रेस पक्ष या दोघांचाही राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यामुळे दर्जा मिळविण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी काय निकष असतात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ठरविण्यासाठी निवडणूक आयोगाने काही निकष ठरवून दिले आहेत. या निकषांची पूर्तता झाल्यानंतर किंवा निकष पूर्ण होत नसतील तेव्हा, वेळोवेळी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो किंवा काढून घेतला जातो. हे परिस्थितीनुसार ठरवले जाते. राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने २०१९ साली दिलेल्या निर्देशांनुसार, ज्या पक्षाची चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये अधिकृत नोंदणी आहे तो राष्ट्रीय पक्ष. किंवा चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांतून शेवटच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अशा पक्षाच्या उमेदवारांनी कमीत कमी ६ टक्के वैध मते मिळवलेली असावीत.

तसेच शेवटच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे किमान चार खासदार निवडून आलेले असावेत. किंवा जर तीन राज्यांत (त्यापेक्षा कमी नाही) लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा जिंकल्या तर राष्ट्रीय दर्जा मिळतो. आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दर्जा का काढून घेतला गेला, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १० जून १९९९ रोजी झालेली आहे. त्यानंतर काही महिन्यांतच १० जानेवारी २००० रोजी त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा दर्जा कायम होता. मात्र त्यानंतर निकषांची पूर्तता होत नसल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना वारंवार नोटीस बजावण्यात आली होती. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालॅण्ड या ठिकाणी पक्षाचे अस्तित्व कमी झालेले आहे. त्यामुळे दर्जा गमवावा लागण्याची शक्यता आहे.

आपला कसा मिळाला दर्जा?
आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मते घेऊन बहुमताच्या आधारावर विजय मिळवलेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांना ६.७७ टक्के मतदान मिळाले होते. तसेच गुजरात राज्यात गेल्या वेळी निवडणूक लढवून चौथ्या राज्यात देखील अधिकृत पक्षाचा दर्जा आम आदमी पार्टीने मिळवला होता. दिल्ली, पंजाब, गोवा आणि गुजरात राज्यांत मतदान मिळवण्याचे निकष पूर्ण केल्यामुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

कुणाचे काय झाले?
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय लोकदल (उत्तर प्रदेश), भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), पीडीए (मणिपूर), पीएमके (पुद्दुचेरी), राष्ट्रीय समाज पार्टी (पश्चिम बंगाल) आणि एमपीसी (मिझोराम) या पक्षांचा राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. भाजपा, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आता आम आदमी पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे.

National Party Status Election Commission NCP TMC Rule

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डॉ. आंबेडकरांच्या ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा असलेले संग्रहालय सज्ज; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

संतापजनक! मुलगी झाली म्हणून बापाने केले हे अतिशय घृणास्पद कृत्य… वाचून तुम्हालाही धक्का बसेल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! मुलगी झाली म्हणून बापाने केले हे अतिशय घृणास्पद कृत्य... वाचून तुम्हालाही धक्का बसेल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011