सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रीय लॉकडाऊन लागणार की नाही? केंद्र सरकारची ही आहे भूमिका

by Gautam Sancheti
मे 5, 2021 | 6:42 am
in संमिश्र वार्ता
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांत देशात कोरोनारुग्णांची संख्या कमी झाली किंवा स्थिर राहिली आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लावण्यास केंद्र सरकार अनुकूल नाहीये. सध्या देशातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे देशव्यापी लॉकडाउन करणे अतिरेक ठरू शकणार आहे. तसेच गरिब लोकांचे हाल होण्याची शक्यताही आहे. परिणामी केंद्र सरकार राष्ट्रीय लॉकडाउन लावण्याच्या बाजूने नसल्याचे चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालय, औद्योगिक संघटना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लॉकडाउन लावण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी तर्कविसंगत असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी लावलेल्या लॉकडाउनविरोधात अनेकांनी टीका केली होती. त्यावेळी लॉकडाउन आवश्यक होता, कारण कोरोना विषाणूबाबत लोक अनभिज्ञ होते. कोरोनावरील उपचाराबाबत लोकांमध्ये संभ्रम होता. सध्या ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि त्या समस्येचे निराकरण करणे सुरू आहे. या गोष्टींचा पुरवठा करण्याचा आणि लॉकडाउन लावण्याचा काहीही संबंध नाही, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.
बहुतांश जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात
आकडेवारीवरून, सध्या १७ राज्यात ५० हजारांहून कमी सक्रिय रुग्ण आहेत. पाच राज्यात संसर्गाचा दर पाच टक्क्यांहून कमी आहे. इतर नऊ राज्यात संसर्गाचा दर पाच ते १५ टक्के आहे. देशातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे देशव्यापी लॉकडाउनमुळे काहीच साध्य होणार नाही. अनेक कंपन्यांमध्ये काम सुरू आहे. निर्यात सुरू आहे. त्याला थांबवून परिस्थिती सुधारण्यापेक्षा आणखी बिघडेल.
लॉकडाउनचा निर्णय राज्यांवर
लॉकडाउन लावण्याचा निर्णय त्या त्या राज्यांवर सोडण्यात आला आहे. काही राज्यांनी त्यावर अंमलबजावणीसुद्धा केली आहे. महाराष्ट्रात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. बिहारमध्ये १५ मेपर्यंत पूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. दिल्लीतही ९ एप्रिलपासून लॉकडाउन सुरू आहे. त्याशिवाय हरियाणा, ओदिशा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, झारखंड आदी राज्यांनी कठोर निर्बंध किंवा लॉकडाउन लावला आहे.
देशव्यापी लॉकडाउन प्रासंगिक नाही
ज्या जिल्ह्यात बेड ६० टक्क्यांहून अधिक भरलेले आहेत, किंवा संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे, त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करावीत, अशा मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने आधीच जाहीर केलेल्या आहेत. काही राज्यांमध्ये बेजबाबदारपणा झाल्याचे लक्षात येताच त्यांना सतर्क करण्यात आले. काही दिवसांनंतर परिस्थितीत सुधारणा होतील असे निरीक्षण तज्ज्ञांनीही नोंदविलेले आहे. त्यामुळे लॉकडाउन लावणे प्रासंगिक ठरणार नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना लस घेण्यास इच्छुक आहात? आधी हे वृत्त वाचा

Next Post

कळवणच्या भूमिपुत्राच्या प्रयत्नातून मिळाले दोन हजार पीपीई किटआणि नावीन्यपूर्ण प्रणाली

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rohit pawar
संमिश्र वार्ता

रोहित पवार यांनी पुन्हा मंत्री संजय शिरसाटवर केला हा मोठा गंभीर आरोप….दिले १२ हजार पानांचे पुरावे

ऑगस्ट 25, 2025
प्रातिनिधीक फोटो
संमिश्र वार्ता

दहा वेळा पळून गेलेल्या विवाहित महिलेचा १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याचा प्रस्ताव….बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 25, 2025
anjali damaniya
महत्त्वाच्या बातम्या

९६ मद्य परवाने नेत्यांची कंपन्यांना?…अंजली दमानिया यांनी शासनाच्या धोरणावर केला हा सवाल

ऑगस्ट 25, 2025
bjp11
महत्त्वाच्या बातम्या

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी या अभ्यासू व आक्रमक नेत्याची निवड….मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

ऑगस्ट 25, 2025
TeamLease Edtech 2
संमिश्र वार्ता

या स्टार्टअप्समध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीच्या संधी: बघा, हा अहवाल

ऑगस्ट 25, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली व जाहीर सभा….दिला हा थेट इशारा

ऑगस्ट 25, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
image0015VMW e1756058042931
संमिश्र वार्ता

आसामला ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा येथील भूखंड…केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

ऑगस्ट 24, 2025
Next Post
IMG 20210505 WA0000 1

कळवणच्या भूमिपुत्राच्या प्रयत्नातून मिळाले दोन हजार पीपीई किटआणि नावीन्यपूर्ण प्रणाली

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011