रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आगामी निवडणुकीसाठी असा आहे ‘नाशिककरांचा पर्यावरण जाहिरनामा’

पाठींबाही त्यालाच जो झाडांच्या राशीला...

by Gautam Sancheti
जानेवारी 31, 2022 | 12:34 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220128 WA0240

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नव्या वर्षाचा पहिलाच महिना झाडांच्या बचावासाठी उघडपणे पुढे आलेल्या नाशिकच्या वृक्ष तथा पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आता राजकीय पटलावर, जो झाडे व पर्यावरणाला उघड पाठींदेतील त्यांनाच पर्यावरणप्रेमी जनतेचा निवडणूकीत पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका व जिल्हा परिषद तथा अन्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूकीय पर्यावरण जाहिरनामा’, तयार करण्याची घोषणा केली.

गंगापूर रोड येथे नासिक वृक्ष संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध संस्थांच्या माध्यमातून वृक्ष तथा पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या प्रसिद्ध म्हसोबा वटवृक्षासह मनपाने तोडण्यासाठी मृत्यूपत्र जारी केलेल्या ४९० झाडांना वाचविण्याची घोषणा केली, त्याच प्रमाणे गोदावरी व नंदिनी नद्यांच्या स्वच्छतेसाठी
काम करण्याची तळमळ व्यक्त केली, या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहर व परिसरात जेवढी झाडे अवैद्यरित्या लाकूडतोड्यांनी तथा झाडे सहन न होणार्‍या लोकांनी केली त्याहून कितीतरी अधिक झाडे ही नाशिक महानगरपालिकेसारख्या स्वायत्त संस्थांनी केली. बहुतांशी प्रकरणात कायद्याची पायमल्ली, पळवाटा व प्रसंगी कायद्यालाच तिलांजली देऊन, विकासाच्या नावाखाली केलेली ही वृक्षतोड नाशिककरच नव्हे तर मानवाच्या मुळावर उठली आहे.

वृक्षप्रेमी नागरिकांनी विकासाचे प्रकल्प राबविताना झाडांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या कायद्यासाठीच आग्रही आहेत, ते कायदेही आडमार्गाने गुंडाळून ठेऊन या स्वायत्त संस्थांनी पर्यावरणाचे रक्षण करून कार्बन पदचिन्हे कमी करण्याची कसुर केली आहे. येणार्‍या काळात नासिकची झाडे या स्वायत्त संस्थांकडूनच धोक्यात येऊ शकतात, नद्यांच्या स्वच्छतेच्या उपाययोजनांच्या नावाने शंखोबा असल्याने, पर्यावरणीय निवडणूक जाहीर नामा तयार करण्याची कल्पना पुढे आली. आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यातल्या बहुतांशी मंडळींनी आजवर झाडांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतल्याचे आढळून येत नाही. बर्‍याच लोकनियुक्त प्रतिनिधींना तर बांधकामातुन मिळणार्‍या टक्केवारीत रस असतो, तर काहींचे झाडे तोडणार्‍यांना पाठबळ असते, त्यामुळे या कामांचा दर्जा निकृष्ट होऊन सुमार दर्जाचे रस्ते व विकास प्रकल्पच आजवर आपल्या माथी मारण्यात आले आहेत. जे मोठे प्रकल्प साकारले त्या रस्ते व उडाणपुलाने शहरवासियांची हक्काची जागा महामार्ग विकसीत करताना गिळंकृत केली व अतिशय अडचणीच्या सर्व्हिस रोड रूपी चक्रव्ह्यूवात नासिकची जनता रोजच अडचणींचा सामना करत आहेत. अनेक अपघात घडल्याचे प्रकार नासिकच्या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या सदोष बांधकामामुळे झाले आणि बदल्यात नासिककरांना पन्नास ते पाचशे वर्षे जुन्या शेकडो झाडांचा बळी दिला जाताना याचीदेही याची डोळा पहावे लागले.

जुनी व मोठी झाडे तोडताना प्रशासनाने दिली आर्श्वसाने पाळली असे अगदी अपवादात्मक प्रकरणात घडले. यात लोकप्रतिनिधींनी बघ्याचीच भूमिका घेतली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणारा वातावरण बदल आणि सातत्याने ढासळले जाणारे पर्यावरण, जागतिक तापमानवाढ व त्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यावर येत असलेले वाईट प्रभाव जे की भविष्यात वाढत जाऊन अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण करणार आहेत व पुढील पिढीस एकवेळचे जेवणही मिळेल की नाही अशा या अती गंभीर विषयावर जाहिरनाम्याच्या रूपाने हा लढा काळाची गरज बनला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक झाड मोफत देत असलेला प्राणवायू तथा असंख्य पक्षी व लहान प्राण्यांचा निवारी असलेली झाडे वाचविण्यावाचून तरणोपाय उरलेला नाही, या साठी नासिककरांचा पर्यावरणीय जाहीरनामा तयार केला जाणार आहे. जे पक्ष किंवा उमेदवार या जाहीरनाम्याला पाठींबा देतील, पर्यावरणाची कोणतीच हानी होणार नाही, अशी शपथ घेतील अशांनाच मते मिळतील अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. म्हसोबा वटवृक्षासह ४९० झाडे वाचविणच्या चळवळीच्या निमित्ताने नासिक वृक्षसंवर्धन समितीला तब्बल २०,००० नागरिकांनी आपला पाठींबा दर्शविला होता. येणार्‍या काळात वृक्ष संवर्धन व नदी स्वच्छतेच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर पर्यावरण प्रेमी जनता या चळवळीशी जोडली जाणार आहे. नासिक शहरा प्रमाणेच ग्रामीण भागातल पर्यावरणाच्या रक्षणासाठी निवडणूकीय जाहीर नाम्याचा वापर केला जाणार आहे.

हेतू हाच की, ”नासिकच्या पर्यावरणाचे कसोशिने संवर्धन व्हावे, विकास म्हणजे केवळ, पुल, रस्ते, बाजारपेठा आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन नव्हे विकास म्हणजे आपल्याकडच्या नैसर्गिक संसाधनांची प्राणपणाने केली जाणारी जपणूक”, या तत्वावर नासिक वृक्षसंवर्धन
समिती कार्यरत राहणार आहे. या बैठकीस ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते रमेश अय्यर, राजेश पंडित, अंबरीश मोरे, मनिष बाविस्कर, मनोज साठे, चंदू पाटील, सागर शेलार, तुषार गायकवाड, डॉ. संदीप आहिरे, कैलास ठाकरे, भक्ती कोठावळे, प्रशांत परदेशी उपस्थित होते. विविध संस्थां तसेच ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांवरून आगामी आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरविण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नो टेन्शन! आता बॅलन्स आणि नेटवर्क नसतानाही करता येणार कॉल

Next Post

काय सांगता! पठ्ठ्याने बनवली जबराट पॉवरबँक; चालणार टिव्ही आणि वॉशिंग मशीनही

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
Next Post
FKYZOcvVgAQuzK2

काय सांगता! पठ्ठ्याने बनवली जबराट पॉवरबँक; चालणार टिव्ही आणि वॉशिंग मशीनही

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011