सप्तशृंग गड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई येथील भाविक श्रीमती लक्ष्मी मंगलाप्रसाद उपाध्याय परिवाराने श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्ट अंतर्गत कार्यान्वित केलेले श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ३ लक्ष रुपयांचे दान तसेच श्री भगवती ३३ ग्रॅम वजनाचा लक्ष्मी अलंकार (अंदाजित मूल्य रु. २.२५ लक्ष) अर्पण करून अनोखे दातृत्व दर्शविले आहे.
श्री भगवतीचे भक्त असलेले उपाध्याय कुटुंबीय हे सातत्याने श्री भगवती दर्शनासाठी आले असतां मा विश्वस्त ऍड श्री दिपक पाटोदकर व क्षेत्र पुरोहित यांनी त्यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कार्य व भाविकांच्या सेवा सुविधांची प्राथमिक माहिती दिली प्रसंगी त्यांनी श्री भगवती सेवेत काहीतरी योगदान देणे बाबत ईच्छा व्यक्त केली असता त्यांशी आवश्यक तो समन्वय करण्यात आला.
सहकुटुंब श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे भेट देवून श्री भगवती आरती करून रु. ३ लक्ष रकमेचा धनाकर्ष व ३.३ तोळे वजनाचा लक्ष्मीहार हा मा. विश्वस्त ऍड श्री दिपक पाटोदकर यांकडे पूर्व संकल्पनेच्या संदर्भासह सुपूर्त केला. प्रसंगी त्यांना भक्तनिवास, प्रसादालाय तसेच इतर अनुषंगिक सेवा-सुविधेची माहिती दिली. संस्थेच्या व्यवस्थापन व प्रशासन कामकाज तसेच समन्वयाचे विशेष कौतुक करून भविष्याकाळात श्री भगवती चरणी सेवा देण्याची ईच्छा दर्शविली. प्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान विश्वस्त संस्थेच्या वतींने करण्यात आला.
प्रसंगी मा विश्वस्त ऍड दिपक पाटोदकर, सनदी लेखापरीक्षक महावीर कटारिया, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, रोप वे व्यवस्थापक श्री राजीव लुम्बा, कमलाकर गोडसे, क्षेत्र पुरोहित श्रीकांत दीक्षित, जयेश दीक्षित, सौ माधुरी दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, ग्रामस्थ तुषार बर्डे, निलेश कदम यासह भाविक उपस्थित होते.