नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुंभमेळा आणि गोदावरीचे अतूट नाते आहे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने भाविक गोदावरीत स्नान करणार असून त्यापुर्वी गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. गोदावरी नदीला गटार मुक्त करण्यासाठी अपयश आलेल्या निष्क्रिय समिती बरखास्त करून या सर्व कामावर देखरेख ठेवण्यासाठी नवीन समिती टास्क फोर्स तात्काळ नेमण्यात यावी. या माध्यमातून गोदावरी जतन व संवर्धन करण्यात यावे,जो पर्यंत महापालिकेकडे गोदावरी तिच्या उपनद्या यांना जाणाऱ्या सांडपाण्याचे उत्तर मिळत नाही. तोपर्यंत एसटीपी मलनिस्सारण प्लॅन्टला मंजुरी देऊ नये. तसेच शहरातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी बिल्डिंग प्लॅन नवीन इमारत बांधकाम परवाने देण्यात येऊ नये अशी मागणी करत नाशिककर गोदाप्रेमींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनत अखिल भारतीय संत समिति, धर्म समाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख श्रीमहंत मंडलाचार्य अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज, शिवसेना सहसंपर्कप्रमुख व गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कदम यांच्यासह गोदाप्रेमी नागरिक उपस्थितीत होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभमेळ्यासाठी राखीव असलेल्या साधूग्राम जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असून या अतिक्रमणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुसलमान गोडाऊन चा वापर गोमास भंगाराचे दुकाने आणि तर अवैध्य विक्री त्या ठिकाणी होत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे तरी त्या ठिकाणी तात्काळ जागा संपूर्ण खाली करून कुंभमेळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा
नाशिकमध्ये पंचवटी हे एक पवित्र स्थान आहे, जिथे भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाचे काही दिवस घालवले, हिंदू धर्मात, गोदावरी नदीत स्नान केल्याने पापे दूर होतात, असे मानले जाते आणि कुंभमेळा या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. रामकुंड गोदावरी नदीवर असलेले हे पवित्र कुंड आहे, जिथे कुंभमेळ्याच्या काळात स्नान केल्याने पाप दूर होतात, अशी श्रद्धा आहे. स्कंद पुराणात, अमृत कलशातून काही थेंब नाशिक, प्रयाग, हरिद्वार आणि उज्जैन येथे पडल्याने या ठिकाणी कुंभमेळा भरतो, असा उल्लेख आहे. कुंभमेळा साधू-संतांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. कुंभमेळा भक्ती, चिंतन आणि आत्मशुद्धीसाठी एक उत्तम वेळ आहे, ज्यामुळे लोकांमध्ये आध्यात्मिक नवीकरण होतेकुंभमेळा दर १२ वर्षांनी नाशिक येथे भरतो. गुरुचा सिंहराशीत प्रवेश आणि सूर्य व चंद्राचे कर्क राशीत प्रवेश केल्यावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने दहा कोटी पेक्षा जास्त भाविकांची गर्दी होणार आहे कुंभमेळा सर्वोत्तम होण्यासाठी नाशिक तीर्थस्थळाला अ दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा.
या निवेदनात नाशिक जिल्ह्याचे धार्मिक महत्त्व असून, नाशिक त्रंबकेश्वर मधील ब्रह्मगिरी येथे गोदावरी नदीचे उगम स्थान असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे तसेच सिंहस्थ कुंभमेळाचेही अनन्य साधारण महत्व आहे अशा त्रंबकेश्वर तीर्थस्थळाला अ दर्जा दिल्याबद्दल नाशिककरांच्या वतीने सरकारचे जाहीर आभार व्यक्त करतो असेही म्हटले आहे.