नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र स्टेट फार्मसी काऊंसिलचे अध्यक्ष अतुल आहिरे व त्यांच्या सहकारी यांनी रविवार २ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते १ चे दरम्यान माजी जिल्हा अध्यक्ष गोरख चौधरी यांचे घरी जाऊन दारूच्या नशेत अर्वाच्य शिवीगाळ करत धमकी दिली. संघटनेचा वाद अशाप्रकारे चव्हाट्यावर आणुन घरा पर्यन्त नेणे हे हे अशोभनिय व भाईगिरीचे कृत्य आहे. या सर्व प्रकारामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब दहशती खाली असल्याचे सांगत या घटनेचा निषेध म्हणुन बुधवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजे पर्यंत गोळे कॉलनी भागातील सर्व रिटेल व हॉलसेल व्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवतील. तसेच सकाळी १० वाजता केमिस्ट भुवन येथे निषेध सभेचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या प्रवृत्ती मुळे, नाशिक केमिस्ट असोसिएशन, नाशिक जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य औषध परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे. संघटनेच्या प्रतिमेस तडा पोहोचविणाऱ्या अप-प्रवृत्तीचा आम्ही सर्व केमिस्ट बांधव जाहीर निषेध करतो. या शांततापूर्ण आंदोलनात सहभाग घेऊन आपला निषेध नोंदवावा असे आवाहनही संघटनाप्रेमी केमिस्ट सदस्यांनी केले आहे.